हरित गृहे (ग्रीन हाउस):-
शेती पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे हे आपले आवडते वाक्य आहे. मान्सून हा भारतीय शेतीचा आधार आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र. मात्र या मित्राच्या लहरीपणाचा फटका सुद्धा आपल्याला बसला आहे. त्यामुळे शेतीच्या एकूण विकासापैकी मोठा विकास मान्सून मुले किंवा पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे रोखला गेला आहे असे म्हटले तरी वावगे नाही.
यातूनच हरित गृह हे तंत्रज्ञान विकसित झाले.
आज महाराष्ट्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. यात खर्च आहे जरूर पण मिळणारा अधिकच फायदा, नियमित आणि हक्काचे उत्पन्न आणि पावसामुळे होऊ घातलेल्या नुकसानापासून होणारा बचाव या मुले हा खर्च खर्च न राहता भांडवली गुंतवणूक बनते.
हरित गृह म्हणजे एखादी बंदिस्त विस्तीर्ण जागा ज्यात नियंत्रित वातावरणात आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केली जाते. हि लागवड फळांची फुलांची व भाजीपाल्याची असते. जागेवरील आच्छादन हे पोलोथिलिन किंवा पोलीकार्बोनेट प्लास्टिक चे असते. काही वेळेस काचेचे सुद्धा आच्छादन केले जाते. यामुळे सूर्यप्रकाश आत येऊ शकतो.
आतमध्ये वातावरण गरम वा थंड करण्याची यंत्रणा असते.
हरित गृह बांधून देणाऱ्या काही कंपन्या आहेत. त्यांच्याशी बोलणी करून हरित गृहे बांधून मिळू शकतात.
साधारणतः प्रती स्क़्वेअर मीटर चा खर्च ७००-७४० असतो.
Comments
Post a Comment