Skip to main content

##आनंद महिंद्रा...

बिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य... :-

भारत देशात जगातील सर्वात श्रीमंत आणि बुद्धीमान बिझनेसमन्सना टक्कर देणारे बिझनेसमन जन्माला आले आहेत. जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या कंपन्यांच्या सीईओपदी किंवा मालक पदावर अनेक भारतीय आहेत. काहींच्या नसेल तर त्यांच्या टॉप मॅनेजमेंटपदावर एक भारतीय तरी नक्कीच असेल. असा किर्तीमान भारतीयांनी जगभरात पसरवला आहे. अशाच एका बिझनेसमनबद्दल माहिती आपण घेणार आहोत. या भारतीय उद्योजकाने बिझनेसमधील सर्व क्षेत्रांमध्ये 'महिंद्रा ग्रुप'चा ठसा उमटवला आहे. तर आज जाणून घेऊयात बिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...

उद्योजक घराण्यात जन्म... प्रसिद्ध उद्योजक हरिश महिंद्रा आणि इंदिरा महिंद्रा यांच्या महिंद्रा घराण्यात आनंद महिंद्रा यांचा 1 मे 1955 जन्म झाला. महिंद्रा तसे मुंबईचे रहिवासी; परंतु हरिश यांनी आनंद यांच्या शालेय शिक्षणासाठी तामिळनाडू हे राज्य निवडले. येथील लवेडेलमधील लॉरेंस स्कूलमध्ये आनंद यांचे शिक्षण झाले.

हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून 'एमबीए'... पुढे आनंद उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या सर्वात प्रसिद्ध अशा हावर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. हावर्ड विद्यापीठातून फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्ट या विषयांचे अध्ययन केले तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून 'एमबीए'चे शिक्षण पूर्ण केले.

1881 साली 'महिंद्रा' व्यवसायात इंट्री... उच्च शिक्षित आणि अमेरिकेतून एमबीए केल्यामुळे त्यांची पहिली नोकरी महिंद्राच्या स्टील कंपनीमध्ये सुरु केली. 1991 ते महिंद्रा ऍंण्ड महिंद्राचे डेप्युटी मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून पदभार सांभाळण्यास सुरुवात केली. 2012 मध्ये आनंद महिंद्रा संपूर्ण महिंद्रा ग्रुपचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि चेअरमन म्हणून नेमण्यात आले. आतापर्यंत ते कंपनी ग्रुपच्या चेअरमनपदावर आहेत.

महिंद्राचा विस्तार... महिंद्राने स्टील प्लॅंटपासून सुरुवात करीत ऑटोमोबाइल, बांधकाम उपकरणे, संरक्षण, ऊर्जा, शेतीची उपकरणे, वित्त आणि विमा, औद्योगिक उपकरणे, माहिती तंत्रज्ञान, हॉस्पिटॅलिटी, लॉजिस्टिक, रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. महिंद्रा ग्रुप ही 19 बिलियन यूएस डॉलरएवढी मोठी संघटना आहे. तर आनंद महिंद्रा यांची संपत्ती 1.55 बिलियन यूएस डॉलर एवढी आहे.

आता पाहू यात आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य... मित्रांनो, बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी एका बिझनेस कार्यक्रमात त्यांच्या जीवनातील पाच महत्त्वाचे घटक सांगितले. या घटकांमुळे ते आज यशस्वी बिझनेसमन म्हणून प्रसिद्ध आहेत. पाहू यात त्यांनी सांगितलेली पाच महत्त्वाची तत्वे कोणती...

    नेहमी मोठा विचार करा - आनंद महिंद्रा सांगतात नेहमी मोठा विचार करा. छोटा विचार केल्याने आपल्याला तेवढेच किंवा त्याहून कमी यश मिळते. म्हणून बिझनेसमन किंवा सर्वसामान्य मनुष्यांने नेहमी मोठा विचार करावा.

    यश मिळेपर्यंत लढत रहा - जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुमचे प्रयत्न चालूच ठेवा. न थकता, लढत रहा आणि तुमचे ध्येय साध्य करा, असे आनंद महिंद्रा सांगतात.

    शांततेने कामातील समस्या सोडवा... काम म्हटले की त्यात असंख्य समस्या आल्याच. त्यानंतर कधी-कधी पारा चढणार, राग येणार हे नक्की. म्हणूनच शांततेने कामातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

    नवे काही शिकण्यावर भर द्या... आनंद महिंद्रा सांगतात, नेहमी नवे काहीतरी शिकण्यावर भर द्या. तुम्ही तरुण असाल किंवा वृद्ध रोज काहीतरी शिका. त्यातूनच आपल्या ज्ञानात वाढ होते आणि जगात वावरण्याचा आत्मविश्वास मिळतो.

    देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावा... आनंद महिंद्रा यांना भारतीय असल्याचा गर्व आहे आणि आपला देश जागतिक महासत्ता कसा बनेल यासाठी ते झटत असतात. म्हणूनच महिंद्रा कंपनी नवनवे तंत्रज्ञान देशात आणत असते आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावत असते. त्याप्रमाणे सर्व भारतीयांनी देशाच्या प्रगतीत आपल्या परीने हातभार लावावा असे, महिंद्रा सांगतात.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...