Skip to main content

#हिरानंदानी ग्रुप...

हिरानंदानी ग्रुप :-

Niranjan Hiranandani यांच्याकडे आपण प्रसिद्ध रियल इस्टेट डेव्हलपर म्हणून पाहतो. मुंबईतील पवईत एक मोठं टाऊनशिप उभारण्याचे काम त्यांनी केले. आणि आजचे सारे डेव्हलपर हिरानंदानी यांचा टाऊनशिपचा यशस्वी कित्ता राबवित आहेत. परंतु, मुंबईकरांना टाऊनशिपची ओळख करुन देणारा हिरानंदानी ग्रुप या सर्वामध्ये उजवा ठरतो. म्हणून आज आपण Niranjan Hiranandani आणि हिरानंदानी ग्रुप यांच्या बिझनेसबद्दल माहिती घेऊयात.

१९८९ साली पवईतील हिरानंदानी हा उच्चभू प्रकल्प पूर्ण झाला. त्यात Niranjan Hiranandani आणि त्यांचे बंधू सुरेंद्र हिरानंदानी यांचा मोठा वाटा. आयआयटी मुंबई, मोठ-मोठ्या आयटी आणि कॉमर्स कंपन्या आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारी जागा म्हणून पवई सर्वात पहिलेच फेमस होते. दरम्यान, अशा मोक्याच्या स्थळी हिरानंदानी ग्रुपने २५० एकर जागा घेतली होती. आणि हिरानंदानी गार्डन्स नावाने डेव्हलप केली.

या अंतर्गत हिरानंदानी यांनी दर्जेदार निवासी इमारती, कार्यालयीन इमारती, हॉस्पिटल, शाळा, उद्याने, समुदाय केंद्र, क्रीडा क्लब, बँका, शॉपिंग मॉल्स, चित्रपट स्टुडिओ, बस गॅरेज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब आणि जलतरण तलाव यांची उत्तम बांधणी केली. एकूण येथे 42 निवासी इमारती आणि 23 कर्मशिअल्स इमारती येथे आहेत.

दरम्यान, हिरानंदानी ग्रुपचे यश आपल्याला त्यांच्या कामातून दिसते. त्यामागे आई-वडिलांचे उत्तम संस्कारही दिसतात. निरंजन आणि सुरेंद्र यांचे वडिल लखुमल हिरानंदानी ख्यातनाम सर्जन म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांचा पद्म भूषण देऊन गौरव केला. वडिलांचा आदर्श समोर असताना निरंजन यांनी कॉमर्सचे शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी चार्टर्ड अकाऊंटचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान आपला छोटा भाऊ सुरेंद्रसहीत हिरानंदानी ग्रुपची निर्मिती केली. आणि मुंबईतील पवई, ठाणे वाशी येथे मोठं-मोठे प्रकल्प निर्माण केले.

आज Niranjan Hiranandani हिरानंदानी ग्रुपचे सहसंस्थापक आणि एमडी आहेत. त्यांचे भाऊ सुरेंद्रही त्यांना उत्त्म साथ देत आहेत. भारतीय बिझनेसमध्ये मोलाचे कार्य केल्यामुळे त्यांचे नाव भारतातील मोठ्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. तसेच ते फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधिश या यादीतही झळकले होते. हिरानंदानी ग्रुपने हिरानंदानी हॉस्पिटलही सुरु केले. त्यांचे पवई आणि ठाणे येथे हॉस्पिटल्स अनेक रुग्णांची सेवा करीत आहेत. घरी डॉक्टरकीचे बाळकडू मिळूनही हिरानंदानी पुत्रांनी स्वतःला  रियल इस्टेट डेव्हलपर म्हणून जगासमोर आणले, ही खरचं आपल्यासाठी प्रेरणादायी बाब आहे.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...