Skip to main content

#रेशीम कीटकांचे पालन...

रेशीम कीटकांचे पालन :-

रेशीम शेतीमध्ये महत्वाचा घटक म्हणजे रेशीम कीटक. यांचे पालन व्यवस्थित करणे फार महत्वाचे असते. रेशीम कीटकांच्या पालन तंत्रज्ञानात हवामानानुसार आवश्यक बदल घडून आणल्यास रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यास वर्षभर रेशीम कीटकांचे पालन करणे सोईचे होतेच याशिवाय ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरते. परंतु हवामानानुसार तापमान, आद्रता व वातावरणातील योग्य ती खबरदारी न घेतल्यास त्याचा रेशीम कीटक पालनावर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होते, रोगांचा पादुर्भाव होतो, तसेच रेशीम कोशाचा दर्जा सुद्धा खालावतो. अशामुळे भाव कमी होतो व तोटा सहन करावा लागतो.

रेशीम कीटकांच्या वाढीसाठी व योग्य शारीरिक क्रियांसाठी तापमान व आद्रतेचे महत्व असते. रेशीम कीटक हा थंड रक्ताचा प्राणी असून शरीराचे तापमान वातावरणातील तापमानानुसार बदलत असते. रेशीम कीटकांचे पालन १५ ते ४० अंश सेल्सियस तापमानात करता येत असले तरी योग्य वाढ व शरीरक्रियासाठी २२ ते २४ अंश सेल्सियस तापमान रेशीम कीटकांना पोषक असते. त्याचप्रमाणे आद्रतेचा देखील रेशीम कीटक पालनावर परिणाम दिसून येतो. आद्रता कमी झाल्यास रेशीम किटकाच्या अन्नग्रहण, पचन, रक्तातील आम्ल- विम्ल निर्देशांक, शरीरातील टाकाऊ वायू बाहेर येण्यास व्यत्यय येतो. तसेच उन्हाळ्यात देखील आद्रता कमी असल्यामुळे पाने सुकतात त्यामुळे कीटक कमी पाला खातात. त्याचबरोबर पानाचाही दर्जा कमी होतो.

कीटक संगोपन गृह-

कीटक संगोपन गृह थंड जागेत असावे किंवा सावली असेल त्या ठिकाणी दक्षिण- उत्तर दिशेने बांधावे. मातीच्या जाड भिंती, पालापाचोळा, कौलारू किंवा ऍसबेसटॉप पत्रे वापरून कीटक संगोपन गृह बांधावे. कीटक संगोपनाच्या छतावर नारळ, भात, गवत इत्यादीचा वापर केल्यास तापमान नियंत्रणास मदत होते. तसेच छतावर मारण्यासाठी विशिष्ठ पद्धतीचे पेंट बाजारात मिळतात, त्यांचा वापर केल्यास ५ ते ६ अंश सेल्सियस कमी होते. कीटक संगोपन गृहाच्या पश्चिम बाजूस विविध झाडे वाढवावीत. प्रामुख्याने तुतीचे झाडे लावल्यास दुहेरी फायदा होतो. पश्चिमेकडील सूर्यकिरणे थोपवून जातात, शिवाय तुतीझाडाचा पालाही कोशनिर्मितीसाठी उपलब्ध होतो.

रेशीम शेती उद्योग

देशात रेशीम उद्योग आणि तुती लागवड क्षेत्र वाढत आहे. साठ हजाराहून अधिक खेड्यात हा उद्योग राबविला जातो. विदभार्तही मोठ्या प्रमाणात तुती लागवड क्षेत्र वाढले आहे. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱया या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. यशस्वी रेशीम उद्योगासाठी तुतीची शास्त्रीय दृष्टीकोनातून लागवड होणे गरजेचे आहे.

रेशीम उद्योग शेतीवर आधारित असा कुटीरोद्योग आहे या उद्योगातून ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटकसंगोपन व धागानिमिर्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो तर अनेक नगदी पिकांच्या तुलनेत हा उद्योग फायदेशीर आहे. या उद्योगामुळे शहरी संपत्ती सहजपणे ग्रामीण नागरिकांकडे वळली जाते. रेशीम उद्योगातून दिवसेंदिवस आपल्या देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे. उच्च प्रतिच्या रेशीम धाग्यास जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे मागणी लक्षात घेता दुबार (बायव्होल्टाईन  जातीच्या कोषउत्पादनाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या तंत्राचा वापर करून तुतीची लागवड करणे फायदेशीर ठरेल.

तुती व रेशीम उद्योगाचे यश हे तुतीच्या एकरी उत्पादित होणाऱ्या पानांवर अवलंबून असते. राज्याचे कृषी विषयक हवामान अवलंबून असते आपल्या राज्याचे हवामान. तुतीच्या व   वषर्भर पानांच्या निमिर्तीसाठी पोषक आहे .त्यामुळे तुती वाढीसाठी चांगले वातावरण मिळते.

तुती लागवडीबाबत घ्यावयाची काळजी :

तुती लागव़ड वाहनांची वाहतूक जेथे जास्त आहे, अशा रस्त्याच्या कडेने करू नये. कारण पानांवर धूळ मोठ्या प्रमाणात बसल्यास अशी पाने रेशीमकीटकसंगोपनासाठी योग्य ठरत नाही कीटकनाशकांचा वापर ज्या पिकांवर वारंवार करावा लागणार आहे,त्या पिकांच्या जवळ तुती लागवड करू नये, त्यात किमान शंभर मीटर अंतर ठेवावे.

रेशीम शेती-उद्योगातून होणारे फायदे

रेशमाच्या अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते.

तुतीचा वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.

रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.

तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.

तुतीच्या पानांमध्ये जीवनसत्वांचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.

विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.

कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...