Skip to main content

#छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरू!:-..

छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरू!:-

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवले. जेव्हा निर्दयी आणि सत्तेसाठी हापापलेले मुघल संपूर्ण देश काबीज करायला निघाले होते तेव्हा त्यांच्यासमोर फक्त शिवाजी आणि त्यांचे निष्ठावंत मावळे उभे ठाकले… मुघलांनी राज्यातील सोने-नाणे संपत्ती लुटली, हिंदूंची मंदिरे उद्धवस्त केली आणि आया-बहिणींची अब्रू लुटली. या सा-या अन्यायाच्या विरोधात पेटून उठत छत्रपती व त्यांच्या मावळ्यांनी दक्षिणेतील तंजावर ते देशातील सत्ताकेंद्र दिल्ली दणाणून सोडली. हा सारा इतिहास आपल्याला माहितच आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज हे एक मुरब्बी नेते होते. त्यांनी राजकारणात वापरलेल्या मॅनेजमेंटची बाजू अनेकांना माहित नाही. म्हणून आज आपण नजर टाकुयात महाराजांनी शिकवलेल्या मॅनेजमेंटच्या काही चॅप्टरवर…

सुयोग्य प्रशासन (Fair Administration) – छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी मुघल आणि इतर शाही रयतेकडून दामदुपटीने कर गोळा करायचे. छत्रपतींनी आपल्या प्रशासनात ही पद्धत बंद करुन आपल्या प्रजेवर अगदी नगण्य कर लावला. त्या कर-महसुलातून मिळणारा पैसा ते रयतेच्या भल्यासाठीच वापरीत असतं. अशात-हेने त्यांनी जनता व राज्य कारभारातील पारदर्शीपणा दाखवला. याचमुळे ते पुढे रयतेचे राजे म्हणून ओळखले जाऊ लागले.

जातीभेदाला थारा नाही (Despised Discrimination) – महाराजांनी आपल्या राज्यात जातीभेद, उच्च-नीच यासंदर्भातील जातीभेदाला थारा ठेवली नाही. मॉसाहेब जिजाबाई यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीचे तंतोतंत पालन करीत महाराजांनी धर्मातही भेदभाव केला नाही. याऊलट औरंगजेबाने महाराजांना दिल्लीला बोलावले होते तेव्हा महाराजांच्या सुरक्षारक्षकांपैकी एक मुसलमान मावळा होता. एवढा महाराजांचा विश्वास आपल्या मावळ्यांवर होता. खरी ताकत आपल्या मनगटात असली पाहिजे, या विचाराचे राजे होते.

भविष्याचा वेध (Ahead of Time) – छत्रपती शिवाजी महाराज हे भविष्याचा वेध घेणारे राजकारणी होते. आपण आज जे काही निर्णय घेत आहोत, या निर्णयांचा भविष्यात आपल्यावर तसेच आपल्या प्रजेवर कोणता परिणाम होईल, याचा विचार ते कायम करायचे. राज्य करताना, गनिमांशी लढताना त्यांनी केलेला पराक्रम भविष्याचा वेध घेणाराच होता म्हणून त्यांना ‘जाणता राजा’ असेही म्हणतात.

व्यापा-यांना चालना (Support to Traders) – महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक व्यापारांना चालना मिळाली. याच काळात व्यापारी त्यांच्या सोयीनुसार व्यापार करण्यास मूभा मिळाली होती. “साहुकार (व्यापारी) हेच राज्याचे भूषण आहे”, हे महाराजांचे ब्रीद होते. म्हणूनच देशी-विदेशी व्यापारी महराजांच्या कारभारावर चांगलीच खूश होती.

अष्टप्रधान मंडळ (Cabinet) – छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राजे आणि प्रशासक होते. त्यांनी त्यांच्या काळात सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. प्रत्येक मंडळाची जबाबदारी त्या-त्या प्रधानावर. या अष्टप्रधान मंडळामुळेच राजे पारदर्शक कारभार करु शकले. तसेच त्यांनी त्यावेळी परराष्ट्र व्यवहार आणि गुप्तहेर खातेही मंत्रिमंडळात सुरू केले होते.

युद्धाचे डावपेच (War Tactics) – पाच-पन्नास हजार मावळे विरुद्ध मुघलांचे लाखोंनी असलेले सैन्य, मुघलांकडे घोडदळ, मोठा तोफखा त्यांच्यासमोर आपला निभाव लागणारच नाही, हे महाराज चांगलेच जाणून होते. म्हणून महाराजांनी युद्धाचे नवनवे डावपेच आणले. गनिमीकावा वापरुन शत्रूला नामोहरम करणे किंवा दूरदृष्टीने नौदलाची स्थापना करणे, ही महाराजांनी वापरलेली काही युद्धकौशल्ये आपल्याला त्यांच्या महानतेचा दाखला देतात. गनिमीकावा पुढे जाऊन ‘गुरिल्ला वॉरफेर’ झाला आणि हे युद्धतंत्र वापरुन छोट्याशा व्हिएतनाने बलाढ्य अमेरिकेस धूळ चारली.

या काही उदाहरणांवरुन 18व्या शतकातही छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंटचे गुरु होते. हे लक्षात येते. महाराजांनी दिलेल्या याच मॅनेजमेंटचा वापर आपला बिझनेस वृद्धिंगत करण्यासाठी करुयात…

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...