Skip to main content

#मिरचीचे यशस्वी उत्पन्न..

नोकरी सोडून आधुनिक शेतीची कास धरली, मिळवले  मिरचीचे यशस्वी उत्पन्न 
    आजकाल शेतीमध्ये काही फायदा नाही म्हणून नोकरीकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु शेतीत अजूनही फायदा आहे आणि याला एखाद्या व्यवसायाप्रमाणे सांभाळले, काटेकोरपणे नियोजन केले तर यशस्वी शेती करता येते.  याच गोष्टीची जाणीव होऊन कराड तालुक्यातील शेरे गावच्या तरुण शेतकऱ्याने बँकेची नोकरी सोडून आणि घरची शेती करण्याचा निर्णय घेतला.
     कृषी मध्येच.बी.एस्सी (बी.एस्सी एग्री) शिक्षण २००८ साली पुर्ण करणा-या वैभव विश्वनाथ पाटील यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका खाजगी बॅंकेमध्ये  एग्री मॅनेजर म्हणुन केली. आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा वापर स्वत:ची शेती सुधारण्यासाठी व्हावा असे त्यांना सतत वाटत असे. त्यामुळे काहीवर्षांनी पुर्णवेळ शेतीकडे लक्ष देण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणा-या बॅंकेच्या नोकरीचा त्याने राजीनामा दिला.

अशी केली प्रगत शेतीची सुरुवात
     हवामान, जमीन व बाजारपेठेचा अभ्यास करून दोन एकरवर मिरची लावण्याचा प्रयोग करण्याचे वैभव यांनी ठरवले.  ऊस हेच प्रमुख पिक असणा-या कराड तालुक्यामध्ये  पाण्याच्या उपलब्धतेचा व बाजारपेठेतील मागणीचा विचार करुन ऊसाखालील क्षेत्र मिरची लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेणे वैभवसाठी जोखीमीचे होते. पारंपारिक शेतीपद्धतीऐवजी  सुधारित तंत्राने शेती करण्याचे त्यांनी ठरविले.

     मिरची लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला.  तसेच वैभवने लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा ही वापर केला. लागवडीसाठी लांब, गडद हिरव्या रंगाच्या सिता या वाणाची निवड केली. मुख्य म्हणजे संपूर्ण गावामध्ये मिरचीचा प्रयोग करणारा हा एकमेव शेतकरी आहे.

    शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही त्यांनी सुरुवात केली. सद्यस्थितीत वैभवकडे ८ म्हशींचा गोठा आहे. त्यांच्यापासुन दैनंदिन २५-३० लिटरचे उत्पादन मिळते आहे. ह्याच गोठ्यातुन मिळणा-या शेणखतापासुन गांडुळखताचे युनिटची बांधणी केली आहे. या युनिटपासून साधारणपणे ३-४ टन गांडुळखताची निर्मीती होत असून व्हर्मीवॉश मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

     मिरचीचे खत व किड व्यवस्थापनासाठी त्याने एकात्मिक पद्धतीचा वापर केला. रासायनिक खताबरोबरच जिवामृत, गांडुळखताचाही वापर शेतात केला जातो. किड व्यवस्थापनासाठी जैविक किडनाशकांबरोबरच प्रकाश सापळे व रंगित स्टिकर्सचाही वापर ते करत आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या शेतात २५ कारागिर नियमित कार्यरत आहेत.

  खर्च व उत्पन्न
मिरचीच्या पिकाला इतर भाजीपाल्याच्या तुलनेत नियमीत भाव मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. वाशी मार्केटमध्ये नियमित विक्री होत असुन आता पर्यंत २६ टन मालाची विक्री त्यांनी केली आहे. येत्या काळात अजुन १५ टन मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे.
एकुण खर्च -  २,५०,०००  रु.
उत्पन्न -  ६,००,००० रु.
खर्च वजा जात - प्रती वर्षी रु.४,५०,०००/-निव्वळ नफा मिळणार आहे.

    वैभव यांचा आदर्श ठेऊन याच गावातील ७ – ८ तरुणांनीही पुर्णवेळ आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. समाजसेवेची  वैभव यांना आवड असून व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र संस्थेचा ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...