Skip to main content

#निरमा....

‘निरमा’ने एकेकाळी सर्फलाही धूळ चारली होती…:-

‘निरमा’ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते एक डिटर्जंट पावडर आणि त्या पाकिटावर असलेली गोंडस मुलगी. साधी कंपनी परंतु जबरदस्त इच्छाशक्ती असललेल्या ‘निरमा’ने या क्षेत्रातील मोठा आणि फॉरेन ब्रॅंड असलेल्या ‘सर्फ’ला धूळ चारली होती. साधारण 1980 ते 2000 पर्यंत सर्वत्र ‘निरमा’चीच चर्चा होती. लोक निरमासाठी दुकानात रांगा लावीत असत पण त्यांना ते प्रोडक्ट मिळत नसे, अशीही परिस्थिती होती. पण हे निरमाने कसे साधले, त्यामागे एक रंजक कथा आहे.

गुजरात राज्यातील मेहसाणामधील करसणभाई पटेल (के. के. पटेल) यांनी साबण आणि डिटर्जंट पावडर बनविण्याचा व्यवसाय सुरु केले. रसायनशास्त्रात पदवीधर झालेल्या करसणभाई यांनी 1969 साली आपल्या घराच्या वरांड्यातच आपला उद्योग थाटला होता. त्यांनी बनवलेली ही उत्पादन ते स्वतः घरोघरी विकत असत. त्यावेळेस एक किलो डिटर्जंट पावडर त्यांनी मात्र 3 रुपयांना विकली. तर बाकीच्या विदेशी कंपन्या तीच पावडर 13 रुपयाला विकत होत्या.

पुढे करसणभाई पटेल कुटुंबात एक दुःखद घटना घडली. त्यांची मुलगी निरमाचे या काळात निधन झाले. आपल्या मुलीच्या स्मर्णार्थ करसणभाई यांनी तिचा फोटो आणि नाव या ब्रॅंडला ठेवले. आणि ‘निरमा’ ब्रॅंड तयार झाला. कमी किंमत आणि असरदार उत्पादनामुळे निरमा ‘सबकी पसंद’ ठरीत संपूर्ण बाजार काबीज केला. आणि काही काळासाठी मार्केटमध्ये अव्वल असलेल्या ‘सर्फ’ची मक्तेदारी मोडीत काढली.

निरमाचे संस्थापक करसणभाई पटेल हे फक्त या उद्योगापुरते सीमीत राहिले नाहीत. त्यांनी निरमा इन्टिट्युशन ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा युनिवर्सिटी ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी, निरमा एज्युकेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन व निरमा लॅब्स, असे अनेक बिझनेस सुरु केले. या मौलिक कार्याबद्दल भारत सरकारकडून 2010 साली पद्मश्री पुरस्कार दिला गेला. तर अशी आहे ‘निरमा’ची कहाणी…

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...