‘निरमा’ने एकेकाळी सर्फलाही धूळ चारली होती…:-
‘निरमा’ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते एक डिटर्जंट पावडर आणि त्या पाकिटावर असलेली गोंडस मुलगी. साधी कंपनी परंतु जबरदस्त इच्छाशक्ती असललेल्या ‘निरमा’ने या क्षेत्रातील मोठा आणि फॉरेन ब्रॅंड असलेल्या ‘सर्फ’ला धूळ चारली होती. साधारण 1980 ते 2000 पर्यंत सर्वत्र ‘निरमा’चीच चर्चा होती. लोक निरमासाठी दुकानात रांगा लावीत असत पण त्यांना ते प्रोडक्ट मिळत नसे, अशीही परिस्थिती होती. पण हे निरमाने कसे साधले, त्यामागे एक रंजक कथा आहे.
गुजरात राज्यातील मेहसाणामधील करसणभाई पटेल (के. के. पटेल) यांनी साबण आणि डिटर्जंट पावडर बनविण्याचा व्यवसाय सुरु केले. रसायनशास्त्रात पदवीधर झालेल्या करसणभाई यांनी 1969 साली आपल्या घराच्या वरांड्यातच आपला उद्योग थाटला होता. त्यांनी बनवलेली ही उत्पादन ते स्वतः घरोघरी विकत असत. त्यावेळेस एक किलो डिटर्जंट पावडर त्यांनी मात्र 3 रुपयांना विकली. तर बाकीच्या विदेशी कंपन्या तीच पावडर 13 रुपयाला विकत होत्या.
पुढे करसणभाई पटेल कुटुंबात एक दुःखद घटना घडली. त्यांची मुलगी निरमाचे या काळात निधन झाले. आपल्या मुलीच्या स्मर्णार्थ करसणभाई यांनी तिचा फोटो आणि नाव या ब्रॅंडला ठेवले. आणि ‘निरमा’ ब्रॅंड तयार झाला. कमी किंमत आणि असरदार उत्पादनामुळे निरमा ‘सबकी पसंद’ ठरीत संपूर्ण बाजार काबीज केला. आणि काही काळासाठी मार्केटमध्ये अव्वल असलेल्या ‘सर्फ’ची मक्तेदारी मोडीत काढली.
निरमाचे संस्थापक करसणभाई पटेल हे फक्त या उद्योगापुरते सीमीत राहिले नाहीत. त्यांनी निरमा इन्टिट्युशन ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा युनिवर्सिटी ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी, निरमा एज्युकेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन व निरमा लॅब्स, असे अनेक बिझनेस सुरु केले. या मौलिक कार्याबद्दल भारत सरकारकडून 2010 साली पद्मश्री पुरस्कार दिला गेला. तर अशी आहे ‘निरमा’ची कहाणी…
Comments
Post a Comment