Skip to main content

#शेतकऱ्याने उद्योजक होण्याचे स्वप्न उतरवल....

शेतकऱ्याने  उद्योजक होण्याचे स्वप्न उतरवले सत्यात
तिसगे कुटुंबीयांनी केली लेअर पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात 

     मूळचे शेतकरी असलेल्या तिसगे कुटुंबीयांचे ध्येय उद्योजक होण्याचे होते. एक सामान्य शेतकरी उद्योजक कसा होऊ शकतो यावर तिसगे कुटुंबीयांनी भर दिला आणि आज शून्यापासून सुरु केलेल्या या व्यवसायाचे रूपांतर चार कोटी उलाढाल होणाऱ्या व्यवसायात झाले आहे.  वजिरखेडे (जि. नाशिक) येथील शशिकांत आणि रमाकांत तिसगे बंधूनी वडिलांकडून मिळालेल्या व्यावसायिकतेच्या वारस्याला आत्मसात करून लेयर पोल्ट्रीचा व्यवसाय उभा केला. या लेअर पोल्ट्री व्यवसायात ४४ हजार पक्षी क्षमता, दररोज ३२ हजार अंड्यांचे  उत्पादन होते.      
     वजिरखेडे गावात  श्रावण पुंजाराम तिसगे (वय ७२) यांच्याकडे १२ एकर शेती आहे. या शेतीत मक्याचे पीक घेतले जाते. श्रावण तिसगे यांचा दूध व्यवसाय होता. अनेक वर्षे यशस्वीपणे व्यवसाय केल्यावर २००९मध्ये तो बंद करण्यात आला. आता त्यांच्या दोन्ही मुलांनी शशिकांत व रमाकांत अर्थाजनाची जबाबदारी स्वीकरून  लेयर पोल्ट्री उद्योगात जम बसवला आहे.

उत्पादन वाढीत सातत्य राखले
१९९८ -  १ हजार ब्रॉयलर पक्ष्यांपासून पोल्ट्री उत्पादनाला सुरवात
२००६ -  २० हजार पक्षी
प्रत्येक आठवड्याला बॅच निघेल असे व्यवस्थापन होते. या उद्योगामध्ये कंपन्यांचा शिरकाव झाल्याने स्पर्धा वाढली. या कंपन्या स्वतःच अत्यंत कमी दर ठरवत. आपले उत्पादन तयार झाल्यानंतर दर आणखी कमी होत. या दरात मांसल पक्षी उत्पादन परवडत नसल्याने अंडी उत्पादनामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.
अंडी उत्पादनाला सुरुवात
२००६ -  १० हजार पक्षी
२००८ - १० हजार
२०१४ -  ११ हजार
पुढे १२ हजार या क्रमाने पक्षीसंख्या वाढवत नेली. आता त्यांच्याकडे ४४ हजार पक्षी आहेत.

व्यवस्थापन हि गुरु किल्ली -
उत्पादकता ः कंपनीच्या निकषानुसार एका पक्ष्यानं २० ते ७२ आठवड्यांत ३३० अंडी द्यायला हवीत. तिसगे यांनी त्यांच्या ९० टक्क्यांपर्यंत ( ३२० अंडी) पोचले असून, त्यात सातत्य ठेवले. मालाची गुणवत्ता उंच असल्याने ग्राहक टिकून राहिला आहे. लेयर उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात गुणवत्तेवर भर दिला जातो. शेडमध्ये पूर्ण स्वच्छता राखली जाते.

खाद्य व्यवस्थापन ः पोल्ट्रीमध्ये संपूर्ण शाकाहारी खाद्यांचा वापर केला जात असल्याने माश्या, कीटक किंवा दुर्गंधी यापासून शेड दूर आहे. या खाद्यामुळे अंडे डागविरहित, पूर्ण पांढरे व आकर्षक आकाराचे मिळते. पक्ष्याच्या वयानुसार खाद्यात बदल केला जातो. पक्षी चिक्‍स अवस्थेत असताना २० टक्के खाद्य दिले जाते.  यापुढील टप्प्यात खाद्याचे प्रमाण बदलते असते.   त्यामुळे वय, वजन आणि वाढ यांची गुणवत्ता वाढते.  स्वतःच्या १२ एकर शेतीमध्ये प्रामुख्याने मका उत्पादन घेतले जाते. पुढील चार महिने पुरेल इतका खाद्याचा साठा तयार ठेवला जातो. सध्या सुमारे ४०० टन मका शिल्लक असून, तो जानेवारी २०१९ पर्यंत पुरेल.

नियमित लसीकरण ः ब्रुडिंग, शेडमधील योग्य तापमान, लसीकरण या बाबी महत्त्वाच्या असून, लसीकरणाचे वेळापत्रक कटाक्षाने पाळले जाते.

धरली आधुनिक तंत्रज्ञानाची कास ः लेयर शेडमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करतात. आधुनिक फिडमिलमुळे खाद्य नियोजन सोपे झाले असून, कच्चा माल मोजण्यापासून सर्व कामे स्वयंचलित यंत्रांनी केली जातात. शेड आवारातच १ टन क्षमतेचा वजन काटा घेतला असून, गरजेनुसार ४००-५०० किलो माल एलेव्हेटरच्या साह्याने ग्राइंडरकडे जातो. अचूकतेबरोबरच वेळ व मनुष्यबळाची बचत होते. प्रतिदिन खाद्य, अंडी उत्पादन, मरतूक यांच्या सर्व नोंदी संगणकात ठेवल्या जातात.

मनुष्यबळ ः मजुरांच्या ५ जोड्या पूर्णवेळ कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येकी ३ लाखांपर्यंत खर्च करून उत्तम क्वार्टर बांधले असून, आवश्यक सर्व सुविधा दिल्या आहेत. परिसरातील १० जणांना रोजगार मिळाला.

८० टक्के मालाची जागेवरच विक्री
    रोटेशनमध्ये उत्पादन मिळण्याच्या उद्देशाने विविध वयाच्या पक्ष्यांचे नियोजन केले जाते. परिणामी वर्षभर व्यापाऱ्यांना पक्षी पुरवठा शक्य होतो. पर्यायाने ८० टक्के व्यापारी कायमस्वरुपी जोडले गेले असून, केवळ २० टक्के उत्पादन बाजारात जाते. वर्षभर प्रतिदिन ३५ हजार अंडी उत्पादन होते. मालेगावला तिसगे यांचे किरकोळ अंडी विक्री केंद्र आहे. त्यात ३ हजार अंडी विक्री होतात. उर्वरित ३२ हजार अंड्यांची जागेवरच व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. सुमारे ८० टक्के मालाची प्री बुकिंग असते.

तिसगे यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये - 
चांगले  व्यवस्थापन व नियमितपणा
बाजाराचा अभ्यास.
कच्चा माल खरेदीसाठी मार्केट विश्लेषक दीपक चव्हाण यांचे मार्गदर्शन   पशुखाद्यावर सुमारे ६५ टक्के खर्च
विमासंरक्षण-  वर्ष २०१५ मध्ये जोरदार पावसाने शेड पडला. त्यात साठविलेल्या मक्‍याचं भिजून नुकसान झाले. मात्र विमा उतरवलेला असल्याने विशेष नुकसान झाले नाही.
   
उत्पन्न व नफा
४४ हजार पक्षी क्षमता असून, खर्च वजा जाता २० लाख उत्पन्न मिळते. येत्या काळात १ लाख पक्ष्यांपर्यंत क्षमता वाढविण्याचे ध्येय. व्यवसायातील उत्पन्न पुन्हा व्यवसायातच गुंतविले जाते.

समोर ध्येय ठेऊन काम सुरु 
शीतगृहात आपण आठ महिनेही माल ठेवणे शक्य असते. त्यामुळे शीतगृह उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थात, भारनियमन हे या व्यवसायापुढील आव्हान आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. त्यावर मात करण्यासाठी एक एकर क्षेत्रात १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...