Skip to main content

#रोपवाटिकेचा व्यवसाय करताना..

रोपवाटिकेचा व्यवसाय करताना तो करणार्‍या शेतकर्‍यांनी चांगले बियाणे खरेदी करून शेतकर्‍यांचा ङ्गायदा होईल अशीच रोपे तयार केली पाहिजे. हा एक प्रकारे शेतकर्‍यांची चांगली सेवा करण्याचा प्रकार आहे. लोकांच्या शेतीच्या प्रगतीला आपण या मार्गाने हातभार लावू शकतो. बर्‍याच शेतकर्‍यांना मिरचीची लागवड कशी करावी माहीत असते. ते मिरचीची जोपासनाही चांगली करतात, परंतु अधिक उत्पन्न देणार्‍या आणि प्रगत बियाणांची माहिती त्यांना नसते. त्यामुळे ते स्वत:चे रोप स्वत: तयार करत नाहीत.

तेव्हा अशा शेतकर्‍यांचा गैरङ्गायदा घेऊन त्यांना कुठल्यातरी हलक्या जातीचे बी आणून त्याची रोपे महागात विकण्याची प्रवृत्ती काही रोपवाटिकांच्या मालकात दिसते. असे न करता चार पैसे जास्त लागले तरी हरकत नाही, पण चांगल्या जातीचे बियाणे आणून ती रोपे शेतकर्‍याला पुरवली पाहिजेत. भाजीपाल्याच्या रोपांची अशी विक्री करता येते. त्याचप्रमाणे ङ्गळझाडे आणि ङ्गुलझाडे यांचीही रोपे विकून चांगला पैसा कमवता येतो. त्यांची माहिती पुढच्या लेखात पाहू. असाच ङ्गळझाडांची आणि ङ्गुलांची रोपे विकण्याचाही व्यवसाय नर्सरीत केला जातो. उलट भाजीपालांच्या रोपांपेक्षा ङ्गळांची आणि ङ्गुलांची कलमी रोपे अधिक किंमतीने विकली जातात आणि त्यातून रोपांच्या विक्रीपेक्षा अधिक ङ्गायदा होतो. भाज्यांच्या रोपांपेक्षा आज खर्‍या अर्थाने ङ्गळांच्या आणि ङ्गुलांच्या रोपांची नर्सरी अधिक गरजेची ठरली आहे. आपल्या देशामध्ये ङ्गळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. असे असले तरी ङ्गळांची चांगली रोपे कोठे मिळतात, याची लोकांना माहिती नसते आणि ङ्गळांची बाग लावताना कोणत्या जातीचे रोप लावले जात आहे याला नितांत महत्व असते. कारण ङ्गळझाडाची जात निवडताना थोडी जरी चूक झाली तरी पुढे त्यातून होणारे नुकसान कायमचे ठरत असते आणि ते लाखो रुपयांचे असते.

त्यामुळे शेतकर्‍यांनी ङ्गळझाडांची लागवड करताना रोपे विकत घ्यायचे असतील तर भारी चौकशी करून ती घेतली पाहिजेत. अन्यथा केवळ शेतकर्‍यांचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होत असते आणि रोपवाटिका तयार करून त्याचा व्यवसाय करणार्‍या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवून उत्तम रोपे तयार केली पाहिजेत आणि त्याबाबतीत विश्‍वासार्हता निर्माण केली पाहिजे. रोपांची निवड चुकली तर आपले नुकसान होते याची जाणीव शेतकर्‍यांनाही असते. त्यामुळे चार पैसे जास्त गेले तरी हरकत नाही, पण विश्‍वासार्ह रोपवाटिकेतून आणि तज्ञ व्यक्तीकडूनच निवड करून ते रोपे खरेदी करत असतात. रोप वाटिका करणार्‍या व्यावसायिकांनी या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. अशीच स्थिती ङ्गुलझाडांचीही असते. ङ्गुलांना सुद्धा चांगले पैसे मिळू शकतात. कोणती ङ्गुलझाडे लावावीत, कोणत्या जातीची लावावीत याची पुरेशी माहिती अजून आपल्याकडे उपलब्ध नाही. कारण आपल्याकडे ङ्गुलशेतीची परंपराही नाही आणि जे काही मोजके लोक ङ्गुले लावतात ते लोक परंपरेने चालत आलेल्या ङ्गुलांचीच लागवड करतात.

सध्या ङ्गुलांच्या अनेक जाती विकसित झाल्या असून त्यांना पैसेही छान मिळायला लागले आहेत. अशा ङ्गुलांची रोपे विक्री करण्याचा व्यवसाय करून हजारो लोक पैसा कमवत आहेत. परंतु हे लोक बहुतेक करून परप्रांतातले आहेत. महाराष्ट्रात ङ्गुलांची रोपे विकण्याचा व्यवसाय म्हणावा तेवढा होत नाही. या क्षेत्रामध्ये मराठी शेतकर्‍यांना ङ्गार मोठी संधी आहे. मात्र ती साधण्यासाठी ङ्गुलझाडे आणि ङ्गळझाडे यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.

मध्य प्रदेशातील संशोधकांनी तयार केले केसांपासून खत
माणसाचे जे केस केर-कचरा करतात त्यांच्यापासूनच आता शेतांसाठी खत तयार होणार आहे. तसेच रासायनिक खतांच्या…

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...