Skip to main content

#चिनी कंपन्यांना पसंती का?


2017-18 आर्थिक वर्षात चीनच्या 4 कंपन्यांनी भारतात स्वतःचे स्मार्टफोन विकून 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त केले आहे. श्याओमी, ओप्पो, व्हिवो आणि हुवाई यांनी मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा तपशील रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला (आरओसी) दिला आहे.

2017 मध्ये या 4 कंपन्यांनी भारतातून एकूण 26,262.3 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. 2017 च्या तुलनेत 2018 आर्थिक वर्षात या कंपन्यांनी 25,460 कोटी रुपयांनी अधिक म्हणजेच 51,722 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.

ऍपल इंडियाने 12 टक्क्यांच्या वृद्धीसह 13,098 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. तर गुगल इंडियाने 9337 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले.

चिनी कंपन्यांना पसंती का?

स्वस्त : चिनी स्मार्टफोन्स स्वस्त असणे त्यांच्या भारतातील लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण आहे. आज भारतीय बाजारपेठेत बजेट फोनपासून मिड-रेंज आणि प्रीमियम शेणीच्या प्रत्येक वर्गवारीत चिनी कंपन्यांचे शेकडो फोन उपलब्ध आहेत.

उत्तम वैशिष्टय़े : चीनच्या स्मार्टफोन्समध्ये कमी किमतीत वापरकर्त्याला महागडय़ा फोनमधील सुविधा मिळतात. सध्या सर्वात लोकप्रिय असलेले फीचर फेस अनलॉक चिनी कंपन्यांच्या 5-6 रुपयांच्या मोबाईलमध्ये देखील मिळते.

ब्रँड इमेज : चिनी कंपन्यांनी स्वतःची ब्रँड प्रतिमा तयार केली असल्याने त्यांना अत्यंत पसंती मिळत आहे. आता चिनी कंपन्यांच्या मोबाईलला देखील ब्रँडप्रमाणे पाहिले जात असल्याचे दिसून येते, पूर्वी असे चित्र निश्चितच नव्हते.

तंत्रज्ञान : चिनी कंपन्या स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचा वापर दिग्गज कंपन्या देखील करत नाहीत. तर ऍपल-गुगलच्या स्मार्टफोमध्ये जर कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असेल तर त्याची किंमत देखील अधिक असते.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...