*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*४७. भीतीमुळे यशाची शक्यता ९०% कमी होते*
--------------------------------
समजा दोन चार माळांच्या इमारतीवर फळीची दोन टोके असतील व एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर त्या फळीवरून तुम्हाला जायला सांगितले तर ? तुम्ही नक्कीच घाबरणार. परंतु ज्याच्या मनात हि भीती नसेल तो त्या फळीवरून ते अंतर पार करेल. याचे कारण मनात असलेला दृढ आत्मविश्वास. आत्मविश्वास असेल तर आपण कोणत्याही भीतीवर मात करून यशस्वी होवू शकतो. त्यासाठी जोखीम घ्यावी लागेल. Not taking any risk in life, itself is a big risk – म्हणजे जीवनात कोणतीही न जोखीम घेणे, हीच एक जोखीमयुक्त बाब आहे.
त्यामुळे यश मिळवायचे असेल तर आधी मनातील भीती दूर करा. हि एक अशी गोष्ठ आहे जी अस्तित्वातच नसते, केवळ आपल्या मनाचा एक खेळ असतो. त्याचे नुकसान तुम्हाला स्वतःलाच होत असते. इतरांवर, तुमच्या स्पर्धकांवर त्याचा कोणताही परिणाम होत नसतो. जगातील अनेक यशस्वी व्यक्तींना अपयशास सामोरे जावे लागले आहे. त्यांनी आपल्या ध्येयाचा सतत पाठपुरावा करून, धैर्याने अडचणीवर व भीतीवर घरात बसून राहिले नाहीत. तुमच्या अपयशाबद्दल इतर लोक व समाज काय म्हणेल याचा विचार करू नका. फक्त तुमच्या ध्येयावर दृढविश्वास ठेवा.
अपयश आल्यास कारणे शोधा, ती समजून घ्या व त्यामध्ये सुधारणा करा, शक्य तेंव्हा तज्ञांचा सल्ला घ्या व जोमाने कामाला लागा, यावेळी मात्र भीती मनात ठेवू नका. कृती करत रहा. अज्ञान, कमी अभ्यास, कल्पनाशक्तीचा अभाव, आत्मविश्वास नसणे, जीवनात ध्येय नसणे हि भीतीची करणे आहेत. भीतीवर मात करून जर जीवन जगाल तरच तुमची आर्थिक प्रगती होईल. तुम्ही काय करणार? सतत घाबरत, भिऊन जगणार कि जीवनातील परस्थितीचा सामना करून जीवन आनंदात जगणार?
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
-----------------------------
Comments
Post a Comment