Skip to main content

#उद्योग आणि मराठी माणूस.._४३. भावा तुझी कधी सटकणार…?_

*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_४३. भावा तुझी कधी सटकणार…?_*
--------------------------------
तुम्हाला शिक्षण, व्यापार किंवा आयुष्यात यश मिळत नाही. गरिबीतून बाहेर पडता येत नाही, बेकारी तोडता येत नाही, बहिणीच्या लग्नाला पैसे नाहीत. वडिलांच्या डोक्यावर कर्ज आहे, राहायला घर नाही, घरचे राहणीमान चांगले नाही; अशावेळी माझ्या मराठी तरुण भावांना राग आला पाहिजे, तुमचे डोके सटकले पाहिजे. जगात बाकीचे श्रीमंत मग आपणच गरीब का? याचा राग यायला हवा व डोके सटकून वेगाने कामाला लागले पाहिजे. तुम्हा लोकांना गरीब, कमकुवत, नापास समजून नाकारले असेल, तर यशस्वी होण्याची जिद्द तुमच्यात निर्माण झाली पाहिजे.

चेतन भगत यांना १० वी मध्ये ७५% गुण मिळाले, तेव्हा त्यांच्या एका नातेवाइकाने त्यांना 'हीच का तुझी औकात' म्हणून हिणवले. पुढे चेतन भगत यांनी खूप अभ्यास केला व आयआयटी प्रवेश परीक्षा पास झाले व सर्वांना आश्चर्यांचा धक्का दिला. पुढे अनेक कादंबऱ्या, चित्रपट लिहिले. तुमच्यात असामान्य कर्तृत्व तेव्हाच निर्माण होईल. जेव्हा तुम्हाला प्रचंड राग येईल. गरिबीचा अपयशाचा, अपमानाचा, तुमचा तुमच्या भाऊकी, भाऊबंद, सरकार इत्यादींनी केलेला अपमान व अन्याय ही तुमची मोठी ऊर्जा असू शकते, जी तुम्हाला प्रचंड यश मिळवून देऊ शकते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमची सटकेल. स्व. जयललितांना विरोधी पक्षातील नेत्यांनी सभागृहात हल्ला करून जखमी केले होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊनच सभागृहात परत येईन अशी शपथ घेतली व पुढील निवडणुकीत त्या विजयी होऊन मुख्यमंत्री म्हणून परतल्या. त्यांच्या रागामुळे त्या आमदार ते मुख्यमंत्री झाल्या.

ज्यांनी तुमचा अपमान, अत्याचार,अन्याय केला अशा दुश्मनांशी भांडण काढणे हा खरा बदला नसून, तुम्ही प्रचंड यशस्वी, श्रीमंत होऊन तुमच्या दुश्मनाचे डोळे दिपतील व तुमची समाजातील वाहवा होऊन दुश्मनाचा जळफळाट होईल, हाच खरा बदला होय. तुम्ही प्रचंड यशस्वी होणे हाच तुमच्या दुश्मनाचा घेतलेला खरा बदला होय. उद्योग करा, श्रीमंत व्हा, तुमचे दुश्मन तुमचे यश बघून जळून जातील.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. 

- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...