तूमचा जवळचा मित्र किंवा नातेवाईक शहराबाहेर गेले आहेत. तेथे ते कोणालाही जवळून ओळखत नाहीत. अशा परीस्थितीत त्यांचे पैशाचे पाकीट एटीएम कार्डसहीत हरवते...
कशी असेल ती परीस्थिती...? विचार करा 🤔🙄
तूम्ही अशावेळी राहत्या ठिकाणाहून त्यांना कशी मदत करू शकाल?
खुप सोपे आहे... जवळच्या मोठ्या पोस्ट ऑफिसमधे जा... त्यांना सांगा, तूम्हाला आयएमओ IMO (इंस्टंट मनीऑर्डर) करायची आहे. पेई नाव, पैसे पाठवणाराचे नाव, रक्कम वगैरे लिहून फॉर्म भरा... पैसे भरा. तूम्हाला एक बंद लिफाफा दिला जाईल.
लिफाफा उघडा आणी तूम्हाला त्यावर सोळा अंकी नंबर दिसेल. तो नंबर तूमच्या पाकीट हरवलेल्या मित्र वा नातेवाईकाला एसएमएसद्वारे पाठवा... जो त्या ठिकाणच्या जवळील मोठ्या पोस्ट ऑफिसमधे जाऊन एक फॉर्म भरून सोळा अंकी नंबर लिहील व तेथे तूम्ही भरलेले पैसे त्याला मिळतील.
तूम्ही १००० ते ५०००० पर्यंतची रक्कम अशा रितीने पाठवू शकता. हे तूम्ही वेस्टर्न युनियन ट्रान्सफरसारखे पैसे पाठवणे समजू शकता... पण देशभरात खुप मोठे नेटवर्क असलेले पोस्ट ऑफीस तूम्हाला कोणत्याही ठिकाणाहून सेवा देवू शकतात. शिवाय पोस्ट ऑफिस अशा ठिकाणीही आहेत जेथे वेस्टर्न युनियनचा मागमूसही नाही.
हे तूमच्या माहीतीसाठी; ही सेवा संपूर्ण भारतात जवळजवळ ४०००० ठिकाणी उपलब्ध आहे.
तूमच्यापैकी कितीजणांना हे माहीत आहे?
Comments
Post a Comment