रब्बीच्या हंगामात मक्याची लागवड कशी केली जावी या लेखात याची माहिती जाणून घेऊयात.
अनुकूल हवामान
रब्बीच्या हंगामात वातावरणात गारवा असतो त्यामुळे तापमानात घट होत असते. परंतु, मक्याच्या पिकासाठी सर्वसाधारण १८ ते २० अंश से. तापमान फलदायी ठरू शकते.
रब्बी हंगामात रात्रीचे तापमान सौम्य असल्यामुळे प्रकाश, श्वसनक्रियेचा वेग कमी होऊन तयार झालेल्या अन्नपदार्थांचा ऱ्हास कमी होतो.
तसेच पानांची लांबी, रुंदी, रचना आणि ७-८ तास असलेल्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद व अधिक होते,त्यामुळे पिकाचा कालावधी वाढून उत्पादनात वाढ होते.
निवडा योग्य जमीन
रब्बीतील मक्याच्या पिकासाठी मध्यम ते भारी प्रतीची सुपीक, पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडावी.
शेतजमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असावे. अशी जमीन मका लागवडीसाठी असते. जमिनीचा सामू (ph) ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
अशी करावी नांगरणी?
मक्याचे पीक घेताना जेवढी जमीन खोल नांगरली असता त्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
म्हणून जमिनीची खोल नांगरट (१५ ते २० सें.मी.) करणे आवश्यक आहे.
कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
तसेच शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी प्रति हेक्टरी १० ते १२ टन (२५ ते ३० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.
पेरणी कधी करावी?
रब्बी हंगामात मक्याची पेरणी साधारणत: ऑक्टोबर ते नोव्हेंबर या करणे उचित ठरते.
पेरणीचा कालावधी लांबला तर त्याचा उगवणीवर व पीकवाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.
पेरणी
रब्बी हंगामामध्ये मक्याची पेरणी ६० सें.मी.अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एकाच बाजूला १८ ते २० सें.मी.अंतरावर दोन बिया चार-पाच सें.मी. खोल टोकण करून करावी.
जर पेरणी सरीच्या दक्षिण बाजूस केली तर सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने उगवण चांगली होऊन पिकांची वाढ जोमात होते.
पेरणी करताना जर अशा प्रकारे नियोजन केले तर प्रति हेक्टरी साधारण ९०,००० रोपसंख्या मिळते व परिणामी उत्पादन अधिक मिळते.
अशाप्रकारे जर पेरणी करायची असेल तर प्रति हेक्टरसाठी २०किलोग्रॅम बियाणे लागते.
असा करावा खतांचा वापर
पेरणी करताना रासायनिक खातानाचा वापर केला जातो.
पेरणीच्या वेळी रासायनिक खते पाच ते सात सें.मी.खोलीवर आणि जमिनीत चांगली मिसळून घ्यावीत.
एकदा का पिकाने जोम धरला कि मग उभ्या पिकांत नत्र खतमात्रा (युरिया) १०-१२ सें.मी. ओळीपासून दूर वळीमधून द्यावे आणि लगेचच पाणी द्यावे.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारण १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
मका उगवणीनंतर दहा दिवसांनी विरळणी करून,एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेवावे.
Comments
Post a Comment