Skip to main content

#मक्याची लागवड...

रब्बीच्या हंगामात मक्याची लागवड कशी केली जावी या लेखात याची माहिती जाणून घेऊयात.

अनुकूल हवामान 
रब्बीच्या हंगामात वातावरणात गारवा असतो त्यामुळे तापमानात घट होत असते. परंतु, मक्याच्या पिकासाठी सर्वसाधारण १८ ते २० अंश से. तापमान फलदायी ठरू शकते.
रब्बी हंगामात रात्रीचे तापमान सौम्य असल्यामुळे प्रकाश, श्‍वसनक्रियेचा वेग कमी होऊन तयार झालेल्या अन्नपदार्थांचा ऱ्हास कमी होतो.
तसेच पानांची लांबी, रुंदी, रचना आणि ७-८ तास असलेल्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया जलद व अधिक होते,त्यामुळे पिकाचा कालावधी वाढून उत्पादनात वाढ होते.

निवडा योग्य जमीन
रब्बीतील मक्याच्या पिकासाठी मध्यम ते भारी प्रतीची सुपीक, पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडावी.
शेतजमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असावे. अशी जमीन मका लागवडीसाठी असते.  जमिनीचा सामू (ph) ६.५  ते ७.५ दरम्यान असावा.

अशी करावी नांगरणी?
मक्याचे पीक घेताना जेवढी जमीन खोल नांगरली असता त्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
म्हणून जमिनीची खोल नांगरट (१५ ते २० सें.मी.) करणे आवश्‍यक आहे.
कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
तसेच शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी प्रति हेक्‍टरी १० ते १२ टन (२५ ते ३० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.

पेरणी कधी करावी?
रब्बी हंगामात मक्‍याची पेरणी साधारणत: ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या करणे उचित ठरते.
पेरणीचा कालावधी लांबला तर त्याचा उगवणीवर व पीकवाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

पेरणी
रब्बी हंगामामध्ये मक्‍याची पेरणी ६० सें.मी.अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एकाच बाजूला १८ ते २० सें.मी.अंतरावर दोन बिया चार-पाच सें.मी. खोल टोकण करून करावी.
जर पेरणी सरीच्या दक्षिण बाजूस केली तर सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने उगवण चांगली होऊन पिकांची वाढ जोमात होते.
पेरणी करताना जर अशा प्रकारे नियोजन केले तर प्रति हेक्‍टरी साधारण ९०,००० रोपसंख्या मिळते व परिणामी उत्पादन अधिक मिळते.
अशाप्रकारे जर पेरणी करायची असेल तर प्रति हेक्‍टरसाठी २०किलोग्रॅम बियाणे लागते.

असा करावा खतांचा वापर
पेरणी करताना रासायनिक खातानाचा वापर केला जातो.
पेरणीच्या वेळी रासायनिक खते पाच ते सात सें.मी.खोलीवर आणि जमिनीत चांगली मिसळून घ्यावीत.
एकदा का पिकाने जोम धरला कि मग उभ्या पिकांत नत्र खतमात्रा (युरिया) १०-१२ सें.मी. ओळीपासून दूर वळीमधून द्यावे आणि लगेचच पाणी द्यावे.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारण १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
मका उगवणीनंतर दहा दिवसांनी विरळणी करून,एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेवावे.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...