*प्रेरणादायी लेख*
_*एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा ते ३००० कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक थक्क करणारा प्रवास..!*_
_नॅचरल आईस्क्रीम ही सर्वाधिक आवडीची आईस्क्रीम म्हणून ओळखली जाते. या आईस्क्रीमच्या मागे दडलीय एक थक्क करणारी प्रेरणादायी कहाणी..._
_कर्नाटक मधील मंगलोर जिल्ह्यातील पतूर तालुक्यातील मुलकी या गावातील रघुनंदन श्रीनिवास कामथ एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा._
_त्यांचे वडील महिन्याला १०० रुपये कमावून त्यात ७ मुलांची कशी तरी गुजराण करत होते. रघुनंदनने अत्यंत हलाखीत दिवस काढले. १५ व्या वर्षी सर्व कामथ कुटुंब कर्नाटक वरून मुंबईला स्थलांतरीत झाले. मुंबईला जुहू कोळीवाड्यातील एका १२×१२ च्या खोली मध्ये सर्व कुटुंब राहायचे रघुनंदन हा घरातील सर्वात लहान सदस्य असल्याने त्याला कॉट खाली झोपावे लागायचे._
_वयाच्या १५ वर्षी मुंबईत सुरुवातीला रघुनंदन यांनी चप्पल विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ जो त्यांच्याहून २० वर्षांनी मोठा त्याचा उसळ पाव चा व्यवसाय होता त्यातून त्याने व्यवसाय वाढवून गोकुळ रिफ्रेशमेन्ट मार्फत साऊथ इंडियन फूड आणि घरगुती आईस्क्रीम चा व्यवसाय सुरू केला._
_रघुनंदन कामथ भावाच्या व्यवसायात भावाला मदत करायचे त्यातून त्यांनी पाहिले की लोकांना आईस्क्रीम जास्त आवडते व ती आवडली तर दुसऱ्यांसोबत शेअर करतात. यातून त्यांना कल्पना सुचली की ग्राहकांना जर फळांचे तुकडे असणारी नैसर्गिक फळापासून बनवलेली आईस्क्रीम कृत्रिम फ्लेवरच्या आईस्क्रीम पेक्षा जास्त आवडेल._
_त्यांनी ही आपली कल्पना आपल्या घरच्यांना सांगितली पण कोणीच ती मनावर घेतली नाही. पण रघुनंदन कामथ एका योग्य वेळेची वाट पाहून होते. काही दिवसांनी त्यांच्या पारिवारिक संपत्तीची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा इतर भावाप्रमाणे त्यांनी मासिक स्वरूपात रक्कम स्वीकारण्या ऐवजी एकदम एक लाख रुपयांची रक्कम घेतली._
_नवीन लग्न झालेल्या रघुनंदन कामथ यांना जाणवले की मुंबई सारख्या शहरात एक लाख रुपयाच्या बीज भांडवलावर व्यवसाय करणे शक्य नाही. याप्रसंगी त्यांची पत्नी अन्नपूर्णा यांनी त्यांना हिम्मत दिली प्रोत्साहन दिले. त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून ३ लाख रुपये जमा करून १९८४ साली आईस्क्रिमच्या व्यवसायात उतरले._
_जुहू विलेपार्ले डेवलपमेंट स्कीम (जेवीपीडीएस) या नावाने ३५० स्केअर फूट जागेत पहिले शॉप सुरू केले. रघुनंदन व त्यांची पत्नी यांच्या सह चार कर्मचारी मिळून हे शॉप सुरू झाले. पहिल्यांदा १० फ्लेवर मध्ये आईस्क्रीम बनवली. सुरुवातीला १५ किलो आईस्क्रीम बनवली ज्यात एका आठवड्यात १ हजार कप विकले गेले._
_सायकल वरून जाऊन ग्राहक जोडण्यासाठी पायपीट करत असत त्यात ते प्रसिद्ध व्यक्तीच्याकडे जाऊन त्यांना आईसक्रिम वितरित करायचे यातून बॉलिवूड मधील प्रसिद्ध व्यक्तीना जोडले. २ वर्षात त्यांनी १४ लाखाचा व्यवसाय केला._
_तिथून त्यांनी मागे वळून पहिलेच नाही त्यांची आईस्क्रीम पर्यटकांच्या पण पसंतीला उतरली. आईस्क्रीम साठी लागणारे दूध ते मुंबईतील दर्जेदार दूध समजल्या जाणाऱ्या नोबल डेरी कडून घेतात तर साखर ही दर्जेदार फार्मा ग्रेड ची घेतात. वडील फळ विक्रेते असल्याने ते स्वतःच फळांचे पारखी आहेत. आईस्क्रीम साठी अत्यंत दर्जेदार गोष्टी घेण्याबाबत त्यांचा पूर्वीपासून कटाक्ष आहे._
_आज नॅचरल आईस्क्रीमचे देशभरात १२५ आऊटलेट आहेत. तर ६० फळापासून १०० हुन अधिक फ्लेवरची आईस्क्रीम उत्पादित करतात. आज कंपनीचे तीन हजार कोटींचे एकून मूल्ये आहे. चारकोप कांदिवली वेस्ट ला त्यांची स्वतःची आईस्क्रीम फॅक्टरी आहे रोज २० टन आईस्क्रीम बनवली जाते व पॅक करून देशभरात वितरित केली जाते._
_तर ही आहे कथा एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा ते ३००० कोटींची उलाढाल असलेल्या नॅचरल आईस्क्रीमचे मालक रघुनंदन कामथ यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास._
Comments
Post a Comment