#ज्युट_बैग_व्यवसाय#
ज्युट म्हणजे ,ताग यांचे पोते कांदा भरने साठी लाखोंच्या संखेने लागतात. याचा कच्चा माल म्हणजे कापड कलकत्ता येथे मिळतो.हां कपड़ा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे घट्ट ,पातळ,अती पातळ, मध्यम घट्ट ,असा मिळतो .हां कापड किलो ने मिळतो .ह्या कापड़ पासून साखरेचे पोते तयार केले ,तर ते साखर कारखान्याना लाखोंच्या संख्येने लागतात,हे पोते म्हणजे गोणपाट , साखर भरने साठी ,आणि ती साखर धान्य गोदाम मधे ठेवन्या साठी सरकार सुद्धा घेते. डाळ,तांदूळ,मका,ज्वारी,गहु,बाजरी,अशा अनेक प्रकारचे धान्य सरकारी गोदाम मधे ठेवणे साठी सरकार ला लाखोच्या संख्येने हे पोते लागतात .सरकार ने प्लास्टिक पोते वापरन्यावर बंदी आणली आहे ,तसेच हे ज्युट चे पोते भारतातील मोठ मोठे डीलर्स लाखोंच्या संख्येने विकत घेवून बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करतात .तसेच दुकानदार घेतात,कांदा भरने साठी कांदा व्यापारी लाखोंच्या संख्येने घेतात. नाशिक जिल्ह्या मधे कांदा भरने साठी हे पोते करोडो च्या संख्येने लागतात .कांदा भरन्या साठी लाल रंगाच्या प्लास्टिक च्या पिशव्या वापरत होते, पण या प्लास्टिक च्या पिशव्या वापरण्यावर सरकार ने बन्दी आणलेली आहे. ह्या ज्युट बैग च्या एका नगावर 5 रूपये नफा मिळतो .आपन रोज 25 हजार बैग जर विकल्या ,तर आपल्याला 5 रूपये एक नग प्रमाणे नफा मिळतो.पण जर आपन या बैग च्या नगावर 3 रूपये नग जरी नफा घेतला ,तरी रोज आपल्या 25 हजार बैग च्या मागे 75 हजार रूपये नफा मिळतो. आपन एक बैग च्या नग प्रमाणे 2 रूपये जरी नफा घेतला आणि रोज 25 हजार बैग जरी विकल्या तरी आपल्याला 50 हजार रूपये रोज नफा मिळतो .रेल्वे च्या मालगाड़ी ने ह्या ज्युट बैग मधेच सम्पूर्ण अन्नधान्य पाठविले जाते. तसेच बाहेरच्या देशात ह्याच ज्युट बैग मधे अन्नधान्य भरुंन जहांजांच्या मदतीने समुद्री मार्गे अनेक देशात वाहतूक करतात .कारण ह्या ज्युट च्या बैग वर्षानुवर्षे सडत नाहीत खराब होत नाहीत .म्हणून ह्या बैग ला भारतात आणि बाहेरच्या देशात खुप मागणी आहे .आपन ह्या बैग भारतात डीलर्स,शेतकरी,सरकार ,साखर कारखाने ,कांदा व्यापारी याना रोज लाखोंच्या संखेने विकू शकतो .कांदा भरने साठी ज्या बैग लागतात,त्या बैग कापने साठी आणि शिवणे साठी मशीनरी ची गरज नाही.लांबी रुन्दी ज्या मापात ग्राहकाला पाहिजे त्या मापात हातात सूरी घेवून कपड़ा कापून , महिला बचत गट च्या महिला याना आपल्या कडून सुतली देवून ,त्याना घरोघरी कापलेला कपडा देवून शेकडो बैग रोज त्यांच्या कडून हाताने शिवून घ्यायच्या . पण साखर आणि इतर अन्नधान्य भरने साठी मशीन ने कापून आणि सीविंग मशीन ने शिवूनच ह्या बैग दयाव्या लागतात. त्या साठी कटिंग मशीन आणि शिलाई मशीन पाहिजे असतात. ह्या कटिंग अणि शिलाई मशीन कलकत्ता येथे मिळतात .
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment