*TATA*
*जगभरात ९६ कंपन्या असूनही रतन टाटांचे देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव का नाही..*
आपल्या देशात अनेक तरूण उद्योजक जन्म घेत आहेत व हा आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावणारा मोठ्ठा मुद्दा आहे. म्हणुनच तर आपल्या सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला. पण याच मेक इन इंडियाचा नारा आणखी एका व्यक्तीने स्वातंत्रपुर्व काळात देऊन आपल्या उद्योग जीवनाला आरंभ केला होता. ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे जमशेदजी टाटा. अर्थातच टाटा ग्रुप चे संस्थापक. आज अनेक नवे उद्योजक टाटांचा आदर्श घेऊन आपल्या धंद्याला प्रारंभ करत असतात.
आता या टाटा ग्रुप ची धुरा आहे रतन टाटा यांच्या हाती. पण या टाटा ग्रुपच्या जगभरात ईतक्या प्रमाणात उद्योग धंदे असुन सुध्दा ते भारतातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत येत नाहीत.
इतकंच नव्हे तर ते आपल्या देशातील अब्जाधीशांच्या यादीत सुध्दा येत नाहीत. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे..? इतका मोठ्ठा उद्योगपती श्रीमंत कसा नाही..? याला काही कारणं आहेत. त्यांचेच प्रतिस्पर्धी मुकेश अंबानी मात्र भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आपले नाव अबाधित ठेऊन आहेत.
पण मजेदार गोष्ट ही की मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असुन सुध्दा त्यांची रिलायंन्स ग्रुप ही कंपनी भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी नाही. तर भारतातील सर्वात मोठ्ठी कंपनी टाटा सन्स ची TCS ही आहे. टाटा कंन्सलटंन्सी सर्वीस प्रायव्हेट लि. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्ठी कंपनी असुन सुध्दा त्याचे मालक रतन टाटा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही आहेत.
*60% मालकी सेवाभावी संस्थांकडे*
टाटा ग्रुपची स्थापना शंभर वर्षा पुर्वी जमशेदजी टाटा यांनी मुंबई येथे केली. त्यांचा मुळ उद्देश हा उद्योगातुन देशसेवा करने हा होता. ते आपल्या उद्योगातुन भारताला इतर देशांप्रमाणे प्रगती पदावर घेऊन जायला इच्छुक होते. त्यांच्यानंतर जे.आर.डी. टाटा यांनी या कंपनीचे मालकत्व स्वीकारलं व 1991 ला ही जबाबदारी रतन टाटा यांनी स्वीकारली. टाटांच्या जगभरात एकुण 96 कंपन्या असुन 26 कंपन्यांचे शेअर्स लोकांसाठी शेअर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.
म्हणजेच सामान्य लोक या 26 कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतात आणि या सर्व कंपन्यांची मदर कंपनी “टाटा अॅन्ड सन्स्” ही यांचे कामकाज चालवते. पण या कंपनीचे रतन टाटा हे पुर्ण मालक नाहीत.
म्हणजे रतन टाटा यांच्याकडे या कंपनीचे पुर्ण मालकी ह्क्क नाहीत. या कंपनीचे 60% मालकी हक्क विविध संस्थांकडे आहेत. त्यामुळे कंपनीच्या नफ्यातील 60% हिस्सा या सेवाभावी संस्थांना जातो. या संस्थांमध्ये जे.डी. टाटा ट्रस्ट, श्री रतनजी टाटा ट्रस्ट इत्यादी संस्था कार्यरत आहेत. ज्या विविध समाज उपयोगी कामांना हातभार लावतात. या सर्व संस्थांची मालकी रतन टाटा यांच्या कडेच आहे.
*टाटा ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट*
हे कारण आहे की येवढा मोठ्ठा उद्योगाचा पसारा असुन सुध्दा रतन टाटा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत. पण जर या संस्थांचा हिस्सा नसता तर रतन टाटा हे केवळ भारतातील नव्हे तर श्रीमंतीच्या यादीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. या वर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणतात की “आपल्या उद्योगातुन देशासाठी काही तरी करणं हाच टाटा ग्रुपचा मुख्य उद्दिष्ट राहिला आहे. आणि तोच आम्ही निभावतो आहे. ”
तर या सर्वावरून आपल्याला कळतं की मोठ्ठी माणसे मोठ्ठी का असतात. मुकेश अंबानीं बाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणतात की “अंबानी हे बिझनेसमॅन आहेत पण मी एक साधा उद्योजक आहे.” त्यांच्या या वाक्यामुळे आपल्याला कळाले असेल की पैसा म्हणजे सर्व काही नाही. उद्योग उभा करायचा असेल तर प्रथम देशाचा विचार करूनच उद्योग सुरू करावा. याचे एक मुर्तीमंत उदाहरण म्हणजे रतनजी टाटा. ते पैशाने सर्वात श्रीमंत नसतीलही कदाचीत पण मनाने सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत रतन टाटा व टाटा ग्रुपचा क्रमांक सदैव पहिला राहिल हे नक्की…!
...
Comments
Post a Comment