Skip to main content

IPO म्हणजे काय ?*

IPO म्हणजे काय ?*

I.P.O. मध्ये मिळालेला शेअर्सचा लॉट लिस्टीगवरती ती कंपनी येत नाही तोपर्यत खरेदी विक्री करता येत नाही. तीन ते सहा दिवसानंतर कंपनी लिस्टीगवरती येते. लिस्टींग वरती येणे म्हणजेच शेअर बाजारात कंपनीचे नाव रजिस्टर होणे. यानंतर कंपनीच्या प्रमोटर्सचा चा व पब्लिक ला विकलेल्या शेअर्स चा संबध संपतो. या शेअर्समध्ये मागणी पुरवठ्याने व मार्केटमधील घडणाऱ्या विविध घटनामुळे किंमतीमध्ये सातत्याने बदल होतो परंतु या बदलाचा परिणाम त्या कंपनीच्या व्यवसायावरती अजिबात होत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे म्हणजे, DHFL चा शेअर्स जर मार्केटमध्ये कितीही पडला तरी कंपनीचा व्यवसाय आहे तिथेच आहे फक्त शेअर पडण्याचे कारण असु शकत कि कंपनी भविष्यात नुकसान मध्ये जाणार असेल, कंपनीच्या कामाकाजामध्ये तुटी आढळलेल्या असतील. कंपनीचा स्कोप बाजारात कमी झाला असेल, चांगल्या संचालकांंनी राजीनामा दिला असेल. . . . वैगरे.

२) शेअर्स किंमती कमी जास्त का होतात ?

शेअर्स च्या किंमतीमध्ये लहान मोठ्या लाटा का निर्माण होतात?

किंमतीमधील लहान बदल होणे हे मागणी व पुरवठ्याचा परिणाम म्हणता येईल. म्हणजेच अनेक दिवस एखाद्या शेअर्स मध्ये खरेदी जास्त झाली होती, त्यामुळे काही गुंतवणूकदार शेअर्स ची प्राईज वाढल्याने ती विकण्याची भिती निर्माण होते व यामुळे शेअर मध्ये विक्री चालु होते. याऊलट सुध्दा घडणार असतेच. म्हणुन लहान लहान बदल होतात.
कंपनीच्या शेअरच्या किंमतीत मध्ये मोठे बदल केव्हा होतात.
एखादी कंपनी अनेक वर्षापासुन सातत्याने वाढत आहे म्हणुन कंपनीमध्ये मोठी पडझड होते असे अजिबात नाही. त्या कंपनीचा शेअर वाढतच जाण्याची शक्यता जास्त असते. वरती मी एका उदाहरणार्थ सांगीतले आहे त्याप्रमाणे मोठे वाढ व घट होऊ शकते. त्यासाठी पुढील कारणे असु शकतात.
१. कंपनीची नफा मिळवण्याची क्षमता कमी होणे.
२. कंपनीमध्ये हिशेबात तुटी तसेच, गैरव्यवहार आढळुन येणे.
३.संचालक मधील एखाद्या संचालकाने स्वतःचे शेअर कारण नसताना कमी करणे.
४.नवीन सरकारी ध्येय-धोरण कंपनीच्या नफ्याला पुरक नसने.
५.कंपनीच्या एखाद्या प्रोडक्टमध्ये दोष आढळने व त्यामुळे कंपनीला.नुकसान सहन करावे लागणे.
६.लेखापरीक्षण करणाऱ्या व्यक्तीने अविश्वास दाखवणे.
७.जागतिक बाजारात मंदीचे संकेत, युध्दाची परिस्थिती, तेलाचे भाव वाढणे. जागतीक राजकारण सुध्दा .. याठिकाणी असणारी व नसणारी कारणे सुध्दा परिणाम करीतात. यामुळे दिर्घकाळ गुंतवणूक करणारे मार्केटमधुन काही काळासाठी बाहेर पडायला लागले कि शेअरबाजारात पर्यायाने कंपनीच्या शेअर च्या किंमतीमध्ये मोठ्या चढ उताराला सामना करावा लागतो.

*mission learn & earn*             *open dmat start trading*
३) मागील पंधरा वर्षात कोणत्या गुंतवणुकीने सरासरी किती टक्के वार्षिक फायदा दिला?

1. सोने - अनेक परंपरागत गुंतवणूक म्हणुन लोक विचार करतात कि सोन्याची गुंतवणुक केली तर जास्त फायदा होऊ शकेल व सोन्याची किंमती पण वाढतात त्यामुळे जास्त रक्कम आपल्याला मिळु शकेल. परंतु मागील पंधरा वर्षात सरासरी 12% एवढाच फायदा सोन्यामध्ये होऊ शकला आहे. उलट मागील पाच वर्षात सोन्यामध्ये फायदाच झालेला नाही. उलट मजुरी व घट यामुळे सोन्यात तोटाच जास्त झालेला दिसत आहे.

2. बँक ठेवी- बँकेत फिक्स ठेवी ठेवल्यानंतर त्या रक्कमेवरती व्याजाचा परतावा मिळतो यासाठी मध्यम व गरीब वर्ग बँकेत ठेवी ठेवतो परंतु विचार केला तर महागाई सहा टक्के वाढते व बँक दर पण सहा ते सात टक्के मिळतो. सुरक्षीत रक्कम म्हणुन आपण याकडे पाहतो परंतु गुंतवणूक म्हणुन योग्य वाटत नाही कारण यामुळे कोणाची अर्थिक परिस्थिती बदलु शकत नाही.

3.Sensex व nifty याचा जर विचार केला तर वार्षिक सतरा ते एकोणीस टक्के एवढा परतावा केलेला दिलेला आहे. म्हणजे भारतीय शेअर बाजार दरवर्षी सतरा टक्केनी वाढतो असे म्हणु शकतो. एवढा व्याजदर कमी म्हणता येवु शकत नाही. फक्त एवढाच यामध्ये फरक आहे कि Sensex व Nifty ला काही वेळा मोठ्या संकटाचा सामना करावा लागलेला आहे. मग 2008 ची व 2013 व 2018 चे काही महीने मार्केट मोठे धक्के पचवले आहेत. यामुळे गुंतवणूक अडकुन राहु शकते.

4. मुचवल फंडस - शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अप्रत्यक्ष मार्ग यांनी फंड मँनेजर नेमणुक करून गुंतवणूकदाराना जबरदस्त नफा मिळवुन दिलेला आहे. जवळपास मागील पंधरा वर्षात सरासरी तेवीस टक्के नफा मिळवुन दिलेला आहे. याला खरोखर गुंतवणूक म्हणता येइल. पण पुन्हा तोच प्रश्न कि मार्केटच्या मंदिला काही काळ सहन करावे लागु शकते।

5. लार्ज कँप व सिलेक्टेड कंपनी - आपल्या देशात यशस्वी कंपन्याची कमी नाही व या कंपनीनी गुंतवणूक करणाऱ्याना पन्नास टक्के पासुन ते तीन हजार टक्के नफा मिळवुन दिला आहे. यासाठी आपण स्वतः व्यवसायिक वृत्तीचे पाहिजे। उद्योजगतेकडे व अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन खुप महत्त्वाचा असतो. दिवसातील काही वेळ वर्तमानपेपर, अर्थशास्त्राच्या न्युज, कंपन्याचे, औद्योगिक लेख व कंपनीची भावी वाटचाल कशी असेल यासाठी विचार करण्यावर दिला पाहीजे. या मधुन नवीन गुंतवणूकदार निर्माण होऊ शकतात      *mission learn & earn*            *open dmat start trading*
विकरम भोसले

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...