Skip to main content

स्टार्टअप इंडियाच्या महाराष्ट्र यात्रेला सुरुवात

स्टार्टअप इंडियाच्या महाराष्ट्र यात्रेला सुरुवात

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व नवउद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्स यांना कल्पना मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यासपीठ उपलब्ध केले आहे. स्टार्टअप इंडियाच्या महाराष्ट्र यात्रेला आज ३ ऑक्टोबरपासून शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व स्टार्टअप्सना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी .विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शिक्षण मंत्री विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेलकर आणि राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते या स्टार्टअप यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. या स्टार्टअप यात्रे अंतर्गत महाराष्ट्रात ठिकठिकाणी बूट कँप आणि यात्रा थांबा उभारण्यात आले आहेत.

बूट कँप :

८ ऑक्टोबर - ठाणे(डोंबिवली)

९ ऑक्टोबर – नाशिक

११ ऑक्टोबर – नंदुरबार

१३ ऑक्टोबर – जळगाव

१५ ऑक्टोबर - औरंगाबाद

१६ ऑक्टोबर - बीड

१७ ऑक्टोबर – सोलापूर

२० ऑक्टोबर - सिंधुदुर्ग (सावंतवाडी)

२२ ऑक्टोबर – रत्नागिरी

२४ ऑक्टोबर - पुणे (बारामती)

२६ ऑक्टोबर - हिंगोली

२७ ऑक्टोबर – अकोला

२९ ऑक्टोबर - चंद्रपूर

३१ ऑक्टोबर – नागपूर

यात्रा थांबा : ४ ऑक्टोबर - पालघर

४ ऑक्टोबर – कल्याण

६ ऑक्टोबर - वेंगुर्ला

६ ऑक्टोबर – मालवण

८ ऑक्टोबर – राजापूर

८ ऑक्टोबर - कुडाळ

९ ऑक्टोबर - कोल्हपूर

९ ऑक्टोबर – सांगली

१० ऑक्टोबर – पुणे

११ ऑक्टोबर – अहमदनगर

१२ ऑक्टोबर - औरंगाबाद

१२ ऑक्टोबर – शिर्डी

१३ ऑक्टोबर – मालेगाव

१३ ऑक्टोबर – धुळे

१५ ऑक्टोबर - जळगाव

१६ ऑक्टोबर – बीड

१७ ऑक्टोबर – नांदेड

१९ ऑक्टोबर – यवतमाळ

१९ ऑक्टोबर – अमरावती

२० ऑक्टोबर – भंडारा

२२ ऑक्टोबर – चंद्रपूर

२२ ऑक्टोबर – गडचिरोली

२३ ऑक्टोबर - नागपूर

या यात्रा थांब्यामधून आणि बूट कँपमधून सर्व स्टार्टअप्स व नव उद्योजकांना या स्टार्टअप यात्रेचा लाभ घेता येईल. ३ तारखेला नागपूर येथे या स्टार्टअप यात्रेची सांगता होईल. या स्टार्टअप यात्रेतून अनेक नव्या संकल्पना उदयास येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्टार्टअप  इंडिया योजनेचा ही महाराष्ट्र यात्रा भाग असून त्यांचा अनेक उद्योजकांना फायदा होणार आहे.

अधिक माहितीसाठी खलील वेबसाईट वर भेट द्या..

www.startupindia.gov.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...