Skip to main content

#उद्योग आणि मराठी माणूस....32

*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_३२. निर्णय क्षमता नसल्यास खूप मोठे नुकसान होते_*
--------------------------------
सुनील या एका ग्रामीण भागातल्या तरुणाची भेट झाली. शाळेत हुशार होता ७५ ते ८०% गुण मिळवायचा, १२ वी नंतर बीसीए केले. नोकरी करावी का व्यवसाय, का स्पर्धा परीक्षा द्यावी यात गोंधळलेला होता. दरम्यान बीसीए झाल्यानंतर १-२ वर्ष स्पर्धा परीक्षा देऊन पाहिल्या, परत नोकरीसाठी पुण्याला जाऊन आला; नंतर म्हणाला आता काहीतरी उद्योग व्यवसाय करू. कोणता करावा हे शोधण्यात २-३ वर्षे अजून घालवली. कशात काय ठरत नाही. घरची स्थिती मध्यमवर्गीय, वडील छोटेसे किराणा दुकान चालवतात. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एक दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले व किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.

अशाचप्रकारे निर्णयक्षमता नसल्यामुळे सुनीलसारख्या लाखो हुशार मुलांचं आयुष्य बरबाद होतं. तुम्हाला आयुष्यात काय करायचंय याचा निर्णय घ्यायला वेळ लावू नका, नाहीतर वेळ व हे जग तुमचा निर्णय घेईल. वेळ व जग ठरवेल तेच आयुष्यभर करण्याची वेळ तुमच्यावर येईल. सुमार बुध्दीचा पण निर्णयक्षमता असणारा माणूस आयुष्यात धाडसाने पुढे जातो, पण निर्णयक्षमता नसणारा अत्यंत हुशार माणूससुध्दा आयुष्यात खूप मागे पडतो. शेवटी मिळेल ते काम नोकरी करून जीवन जगायला लागतं. आपलेच शाळेचे मार्कलिस्ट स्वतःच बघत बसतो. तो आपल्या मुलांनाही सांगत नाही, की मला इतके मार्क पडायचे, कारण मुलं म्हणतील की तुम्ही एवढे हुशार होता, तर मग अजून इथेच कसे. हल्लीची मुलं इंटरनेटमुळे इतकी हुशार झालीत, की पहिल्या सारखं लेमन गोळ्या, चॉकलेट देऊन लहान मुलांना भूलथापा द्यायचे दिवस गेले. शेवटी अशा निर्णयक्षमता नसणार्‍या पण हुशार माणसाचे आयुष्य असेच छोटेमोठे काम, रोजगार, नोकरी करण्यात निघून जाते. आपल्या शाळेत इतके हुशार होतो, पण आयुष्यात खूप मागे राहिलो याची खंत त्याच्या मनाला आयुष्यभर लागत असते. त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, वाचा, निर्णय घेण्यास वेग द्या व आपल्याला सुनील होण्यापासून वाचवा.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. 

- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...