*आयात आणि निर्यात उद्योगात मोठ्या संधी..*
भारतात खुली अर्थव्यवस्था आल्यामुळे आयात निर्यात या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झालीय याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. विदेश व्यापार करणाऱ्या व्यक्ती तसेच कंपन्यांना भारत सरकारही आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय व्यापारासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
भाजीपाला उत्पादकांसाठी खरोखरच निर्यात हि एक सुवर्णसंधी आहे. मुळात आज भाजीपाला खात्रीशीर बाजारपेठेचा उरला नाही असे बोलले जाते. प्रतिकूल हवामानाचा सामना करताना लहरी बाजारपेठेचा सामना करणारे भाजीपाला हेही एक मुख्य शेतमाल आहे. यात बदल करायचा असेल तर भाजीपाला निर्यातीवर लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थिती राज्यातून मोठ्या प्रमाणात भेंडी, मिरची, शेवगा, फरसबी, कारले आणि दुधी भोपळा यांची निर्यात होते.
*यासोबतच भाजीपाल्यावर ती प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते..*
✈ *आयातदार कसा शोधावा?*
विवध माध्यमांतून शेतकऱ्यांना आयातदार शोधता येतो. तसेच काही संकेतस्थळावरही (अपेडा) यांची माहिती उपलब्ध असते. आयातदरांची यादी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष आयातदरांशी संपर्क साधावा लागतो व निर्यातीसाठी उपलब्ध भाजीपाल्याची माहिती द्यावी लागते. आयातदाराची बाजारातील प्रत तपासणेही जरुरीचे असते.
🚢 *निर्यातीपुर्वी:*
ज्या देशात निर्यात करावयाचा आहे, त्या देश नेमकी काय मागणी आहे, तेथे नेमकी कशी गुणवत्ता हवी आहे, प्रतवारी, पॅकिंग व दर याची माहिती तेथील आयातदारांकडून करुन घ्यावी. वरील बाबतीत सर्व खात्री झाल्यानंतर माल पाठवितानाही योग्य हाताळणी करून पॅकिंग तयार करावे. परदेशात विक्रीसाठी आकर्षक, ताजा, टिकाऊ व सुबक पॅकिंगमधील भाजीपाला व शेतमाल पाठविला पाहिजे. आपली हाताळणी जेवढी शात्रोक्त, तेवढा परदेशात आपला मालाला उठाव अधिक राहणार आहे, याची नोंद उत्पादक निर्यातदराने घ्यावी. यातील महत्वाचा घटक पॅकिंग हाउस आहे. पॅकहाउस आहेत.
📜 *निर्यातीसाठी आवश्यक सुविधा:*
भाजपला हा नाशवंत माल असून त्याच्या निर्यातीसाठी शीतसाखळी ही शेवटच्या टप्प्यापर्यंत ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. भाजीपाला पिकाच्या निर्यातक्षम दर्जाच्या उत्पादनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणेही आवश्यक आहे. याकरिता पॅकहाउस, कोल्ड स्टोअरेजेस या बाबी महत्वाच्या आहेत.
Comments
Post a Comment