Skip to main content

#उद्योग आणि मराठी माणूस..ध्येय...33

*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_३३. ज्याला आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही_*
--------------------------------
ह्या पृथ्वीतलावावर मुख्यतः तीन प्रकारचे जीव आहेत. एक वनस्पती, दोन जनावरे व तीन माणूस. माणूस इतर दोघांपेक्षा वेगळा आहे, कारण त्याला बुध्दी आहे व तो विचार करतो. जो माणूस फक्त बापजाद्यांनी कमावलेल्या दोन एकर जमिनीत जेवढे उत्पन्न येते तेवढेच घेतो व दोन वेळचं खातो, एखादी छोटीशी नोकरी करतो, महिन्याचा पगार त्याच महिन्यात खाण्यापिण्यासाठी संपवतो व शेवटी जेथे जन्मला तेथे मरून जातो, अशा व्यक्तीमध्ये व जनावरामध्ये काहीच फरक नसतो. गाय, म्हैस असे प्राणी आणि सर्व पक्षीही दोन वेळचे किंवा मिळेल ते अन्न खातात व निसर्गाने दिलेले आयुष्य तेवढे जगतात व मरून जातात. जो स्वत:करिता जगतो त्याच्या जगण्याला अर्थ नाही. तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा, तुम्ही कसे जगलात याला महत्व आहे.

ज्याच्या आयुष्यात ध्येय आहे व जो प्रेरित आहे तोच खरा मनुष्यप्राणी आहे. त्याचे पूर्ण आयुष्य चैतन्य, उत्साह व नावीन्याने बहरलेले असते. अशी माणसं २४ तास, ३६५ दिवस व्यस्त असतात. जसे शिवाजी महाराजांना मुघलांकडे सरदारकी मिळाली असती व संघर्षाविना आपले वैयक्तिक आयुष्य जगता आले असते, परंतु त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापण्याचे ध्येय अंगी बाळगले होते. या ध्येय वादामुळेच ४०० वर्षानंतरही छत्रपती आपल्या मराठी माणसाच्या मनावर राज्य करून आहेत. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत यश संपादन करावयाचे असेल, तर ध्येय समोर ठेवून परिश्रम घेतल्यास नक्कीच यश मिळते. नाहीतर ज्या माणसाला ध्येय नाही, जो आयुष्यात काही कमवत नाही. जो केवळ पूर्वजांच्या कमाईवर आपला उदरनिर्वाह करतो, एखाद्या छोट्याशा नोकरीवर जीवन जगतो असा माणूस गेल्यानंतर कोणी त्याची आठवण तरी काढते का? तेव्हा माणसाने ध्येयवादी असले पाहिजे.

माणसाचे ध्येय जितके मोठे तितका माणूस मोठा होतो. त्याच्या हाताला यश आपोआप येते. पैसा त्याच्याकडे आपोआप येत राहतो. अनेकांचे सहकार्य त्याला आपोआप मिळत जाते. तुम्हाला जे काही व्हायचे आहे ते रोज तुमच्या डोक्यात आले पाहिजे. त्यासाठी तितके प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका. अभ्यासपूर्वक नियोजन करा, यश तुमचेच असेल. मोठ्या ध्येयाने प्रेरीत झालेल्या व्यक्तीच्या मागे हजारो, लाखो लोक जातात व त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत व सहभाग देतात.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. 

- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...