अंतर्मनाचा आवाज
एका राजा ने अतिशय सुंदर ''महाल'' बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ''गणिताचे सूत्र'' लिहीले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला मी माझा उत्तराधीकारी घोषित करेन. कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अश्या व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी !
घोषणा ऐकून राज्यातले मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण असं सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिल नव्हतं ? मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी ३ लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू त्यामधील २ जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता. गणितज्ञानी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली पण दरवाजा उघडु शकले नाही ? सर्व लोक हैराण झाले कि जिथे एवढे मोठे गणितज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस? शेवटी त्याला सांगण्यात आल की चला तुमची वेळ आली आहे ! शेतकऱ्याने सहज स्मित केलं दरवाजाकडे गेला सूत्र वाचलं पण त्याला काय कळणार ?? शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला मागे ढकलले !!
आणि काय आश्चर्य दरवाजा सहज उघडला ? सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जयजयकार केला !! नंतर त्याचा सन्मान करुन राजाने सहज विचारलं की आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला ?? तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की मी विचार केला कि गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान सुत्रं वापरतात पण दरवाजा उघडत नाही मग सुत्रच खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर त्याला कडीकुलुप पण दिसत नाही ? मी ठरवलच होतं की समस्या काय हे पहिले बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरवु आणि मी तेच केल.
कित्येकवेळा जीवनात ''समस्या'' ही नसतेच पण आम्ही त्या विचारांनीच अर्धमेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते.
जीवन दुःखी होण्याच हेच मोठं कारण आहे की आम्ही नको तिकडे जास्त लक्ष देतो !
(व्हाट्स अँप वरून साभार..लेखकाचे नाव माहीत असल्यास कॉमेंट मध्ये पोस्ट करावे..पोस्ट वर लेखकाचे नाव प्रकाशित केले जाईल!)
Comments
Post a Comment