Skip to main content

#अंतर्मनाचा आवाज...

अंतर्मनाचा आवाज

एका राजा ने अतिशय सुंदर ''महाल'' बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ''गणिताचे सूत्र'' लिहीले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला मी माझा उत्तराधीकारी घोषित करेन. कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अश्या व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी !

घोषणा ऐकून राज्यातले मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण असं सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिल नव्हतं ? मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी ३ लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू त्यामधील २ जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता. गणितज्ञानी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली पण दरवाजा उघडु शकले नाही ? सर्व लोक हैराण झाले कि जिथे एवढे मोठे गणितज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस? शेवटी त्याला सांगण्यात आल की चला तुमची वेळ आली आहे ! शेतकऱ्याने सहज स्मित केलं दरवाजाकडे गेला सूत्र वाचलं पण त्याला काय कळणार ?? शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला मागे ढकलले !!

आणि काय आश्चर्य दरवाजा सहज उघडला ? सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जयजयकार केला !! नंतर त्याचा सन्मान करुन राजाने सहज विचारलं की आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला ?? तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की मी विचार केला कि गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान सुत्रं वापरतात पण दरवाजा उघडत नाही मग सुत्रच खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर त्याला कडीकुलुप पण दिसत नाही ? मी ठरवलच होतं की समस्या काय हे पहिले बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरवु आणि मी तेच केल.

कित्येकवेळा जीवनात ''समस्या'' ही नसतेच पण आम्ही त्या विचारांनीच अर्धमेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते.

जीवन दुःखी होण्याच हेच मोठं कारण आहे की आम्ही नको तिकडे जास्त लक्ष देतो !

(व्हाट्स अँप वरून साभार..लेखकाचे नाव माहीत असल्यास कॉमेंट मध्ये पोस्ट करावे..पोस्ट वर लेखकाचे नाव प्रकाशित केले जाईल!)

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...