Skip to main content

#उद्योग आणि मराठी माणूस...27

*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_२७. बिझनेस वाढवण्याच्या चार पायऱ्या_*
--------------------------------
तुम्ही जर व्यावसायिक असाल, तर व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करणे, त्यांना आपल्या उत्पादनांशी संलग्न ठेवणे, नवीन ग्राहक बनवणे व ते टिकवून ठेवणे आवश्यक असते. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ग्राहकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, परंतु ते कसे कार्य करते?

ग्राहक विश्लेषणाच्या सुरुवातीला आपल्या ग्राहकांना आपल्या व्यवसायाबद्दल/उत्पादनांबद्दल/सेवांबद्दल माहिती देणे, त्यांना काय हवे आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत व ग्राहकांपर्यंत कसे पोहोचावे याचा अभ्यास करण्यासाठी प्रोडक्टिव्ह मॉडेलिंग, डेटा व्हिज्युअलायझेशन, माहिती व्यवस्थापन व विभाजन या तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे व्यवसायवृध्दी व विश्वासार्हता याबाबत वैयक्तिक अनुभव मिळतात.

>> ग्राहक विश्लेषणाची गरज का आहे? : आताचे ग्राहक पूर्वीपेक्षाही जागरूक व सशक्त आहेत. त्यांच्या अपेक्षा उच्च असतात आणि त्यांच्या निवडी ब्रॅंडस सोबत असलेल्या सकारात्मकतेवर आधारित असतात. ग्राहकांना नक्की काय हवे व ते उत्पादने व सेवा खरेदी करताना कसे वर्तन करतात, हे समजून घेऊन विक्रेत्यांनी योग्य ग्राहकांवर लक्ष केंद्रित करावे, त्यामुळे आपली उत्पादने व सेवा खरंच त्यांना अपील करतील. ग्राहक विश्लेषणामुळे विक्रेते योग्य ग्राहक व त्यांची आवड ओळखू शकतात. व ग्राहक त्यांना अपेक्षित उत्पादने/सेवा प्राप्त करू शकतात. त्यामुळे ग्राहक विश्लेषणामुळे विक्रेता व ग्राहक या दोघांचाही फायदा होतो.

>> तंत्रज्ञानाचे महत्व : ग्राहक विश्लेषणाचा, तंत्रशिक्षणाचा भविष्यातील विकासाशी घनिष्ट संबध आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यास ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो. आपली उत्पादने/सेवा/ब्रॅंड याबाबत त्यांची मते व अनुभव जाणून घेता येतात, तसेच त्यामुळे मार्केटचे व ग्राहकांचे त्वरित मत व पूर्वानुमानित विश्लेषण जाणून घेता येते.

>> बिझनेस वाढवण्यासाठी चार महत्वपूर्ण पायऱ्या आहेत.

१) ग्राहकांना आकर्षित करणे: मार्केटमध्ये अनेक व्यावसायिक/कंपन्या आहेत. चांगले ग्राहक मिळवण्यासाठी आधी ग्राहक व त्यांच्या नेमक्या अपेक्षित गरजा समजून घेतल्या पाहिजेत. आपली उत्पादने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य मार्केटिंग तंत्र व ऑफर्सचा उपयोग करावा.

२) ग्राहकांना आपल्या व्यवसायाशी संलग्न करणे/जोडणे: नुसते ग्राहकांना आकर्षित करून उपयोग नाही, त्यामुळे यश मिळेलच याची शाश्वती नाही, तर ग्राहकांशी चांगले संभाषण कौशल्य ठेवणे, त्यांच्या अपेक्षा व मते समजून घेणे, त्यांना व्यवस्थित जाणणे व सतत त्यांना सर्वोतम गुणवत्तापूर्ण उत्पादने व सेवा पुरवणे हे महत्वाचे कार्य असते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांमध्ये आपल्या उत्पादनांबद्दल रुची निर्माण होते व ते आपली उत्पादने/सेवा/ब्रॅंडशी जोडले जातात. ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणे. त्यांच्या नेमक्या गरजा ओळखणे व त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करणे हे आपले अंतिम ध्येय असावे.

३) नवीन ग्राहक बनवणे: आपण आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बराच वेळ, पैसा, मेहनत खर्च करतो. ग्राहकांना तुमच्या उत्पादनांबद्दल आवड असेल, तर त्यांना योग्य वेळी, उत्कृष्ट उत्पादने, सेवा यांची विक्री करणे हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आपल्या उत्पादनांबद्दल/सेवांबद्दल त्यांची मते लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नवीन ऑफर्स, डिस्काऊंट या पर्यायांचा वापर करावा म्हणजे आपल्या उत्पादनांचा दर्जा उत्तम असावा त्यामुळे अधिकाधिक नवीन ग्राहक मिळवण्यास मदत होते.

४) ग्राहक टिकवून ठेवणे: ग्राहकांनी एकदा उत्पादने/सेवा विकत घेणे उपयोगाचे नसते. आपला ग्राहक वर्ग निरंतर टिकून राहिला पाहिजे, त्यासाठी तुमचा अनुभव चांगला असावा. ग्राहकांच्या इतर गरजा समजून तशी उत्पादने व सेवा पुरवण्यासाठी तुमच्याकडे योजना असावी. आपले वर्तमान ग्राहक टिकवण्यासाठी त्यांच्या अपेक्षा व गरजांची पूर्तता करून त्यांना समाधानी ठेवावे. आज काल सोशल मीडिया, ईमेल, सीआरएम याद्वारे ग्राहक टिकवून ठेवता येतात.
  
बिझनेस ही एक जटिल प्रक्रिया आहे, त्यामुळे व्यवसायवृध्दीसाठी ग्राहकांशी चांगले संबध टिकवण्यासाठी या चार पायऱ्या उपयुक्त आहेत. त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करून तुमच्या उत्पादनांबाबत त्यांच्या मनात आवड जागृत करणे, त्यांना आपले ग्राहक म्हणून रूपांतरित करणे व त्यांच्या अपेक्षा गरजांची पूर्तता करून आपला ग्राहक वर्ग टिकवून ठेवणे या चारही पायऱ्यांचे महत्व लक्षात घेतले पाहिजे, त्यामुळे तुमच्या व्यवसायाला अधिक गती प्राप्त होईल.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. 

- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते 

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...