Skip to main content

लक्षात ठेव्यासारख्या ५ गोष्टी.

*लक्षात ठेव्यासारख्या ५ गोष्टी... ज्यामुळे करू शकाल कोणत्याही परिस्थितीचा सामना*
------------------------------------------
पैशाला आपल्या जीवनात अन्यसाधारण महत्व आहे. अनेक जण तुमचे यशा-अपयश हे पैशाच्या आधारे ठरवत असतात पण यश-अपयश हे प्रत्येकाच्या जीवनात येत असते. काही जण अपयशाला सामोरे गेल्यावरही निराश न होता आयुष्यात पुढे जातात. तर काही जण तेथेच घुटमळत राहतात. पण हे सत्य आहे की वाईट वेळेनंतर चांगली वेळ ही येत असते. त्यामुळेच वाईट प्रसंगाचा धैर्याने सामना करणे गरजेचे असते. अनेकदा असाही प्रसंग येतो की आपले धैर्य खचते. आपला आत्मविश्वास डळमळीत होतो.

>> जेव्हाही वाईट वेळ येईल लक्षात ठेवा या गोष्टी

सुप्रसिध्द गुंतवणुकदार वॉरेन बफे आणि लेखक रामित सेठी यांच्या म्हणण्यानुसार, वाईट परिस्थितीवर मात करण्याचे काही नियम आहेत. तुम्ही जर ते नियम पाळले तर तुम्ही या परिस्थितीवर निश्चितच मात कराल आणि जीवनात यशस्वी व्हाल. आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्याची तुम्ही वाईट काळात काळजी घेणे गरजेचे आहे.

१) पहिली बाब: दुख: आणि अपयश हा जीवनाचा भाग आहे.

काय होईल यामुळे: ही बाब लक्षात ठेवल्यास तुमचे धैर्य कायम राहील.

२) लक्षात ठेवण्याची दुसरी गोष्ट: वाईट वेळ निघुन जाते.

यामुळे काय होईल: तुम्ही वाईट काळाला सहज सामोरे जाल.

३) तिसरी गोष्ट: जास्त विचार करु नका, चिंता तर मुळीच करु नका.

यामुळे काय होईल: तुम्ही अपयश विसरुन सातत्याने चांगले काम करु शकाल.

४) चौथी गोष्ट: तुमच्यासोबत घडलेली घटना, प्रसंग तुम्हाला काही तरी शिकवतो. त्याला ताकद बनवा कमजोरी नाही.

यामुळे काय होईल: हताश न होता तुम्ही अपयश स्वीकाराल. अनुभवातून मिळालेला धडा तुम्हाला नवा आत्मविश्वास

५) पाचवी बाब: मला पुढे जायचे आहे.

यामुळे काय होईल: मला पुढे जायचे आहे असे ठरविल्यास तुम्ही नवे मार्ग शोधाल आणि पुढे जाल. तुमच्यातील नकारात्मकता आपोआपच दुर होईल.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...