Skip to main content

#कुठंय मराठी माणूस -❓

कुठंय #मुंबई आणि कुठंय #मराठीमाणूस -❓❓

प्रत्येक मराठी माणसाने हा प्रश्न स्वतःला विचारावा - आम्हाला विश्वास आहे उत्तर काहीचं येणार नाही- कारण  मुंबई मध्ये तुमची स्वतःची जागाचं शिल्लकचं कुठं राहिली नाही -

प्रश्न विचारला जातो - मुंबई कोणाची आहे ❓❓ भाबडे मराठी लोक जे कुठ घर - संसार चालवावा म्हणून #नोकरी करत असतात - काही झोपडपट्टीत राहत असतात - काही एखाद्या पक्षाचे संघटनेचे नेत्याचे कार्यकर्ते असतात , अशी लोक म्हणतात, मुंबई आमची आहे - आणि आमचीचं राहणार परंतू प्रत्येक्षात काहीचं नसतं - मुंबई आपली राहिलीचं नाही - हो जरी तुम्हाला पटतं नसलं तरी हेचं परखड असं सत्य आहे -

मग का - कशी - कोणामुळे - गेली असावी मुंबई आपल्या हातून - आमच ठाम - स्पष्ट आणि ठोक मत आहे - मुंबई तुमच्या आमच्या हलगर्जीपणामुळे हातून गेली - आपल्याला "त" म्हणता ताक कळालचं नाही - आपला फक्त वापर झाला - भावनेचा नुसता खेळ झाला - बाजार झाला - भामट्यांनी आपलं आपलं भागून घेतलं आणि तुम्ही आम्ही केवळ पाहत राहिलो  हाती धुपाटनं  घेऊन - आणि आजही आपण फक्त कोणाच्या तरी हाताचे बाहुलेचं तर आहोत - कुठय मग आपला #स्वाभिमान ?? कुठ गेला आपला #मराठीबाणा ???

लक्षात घ्या ,, हाणामारी करून - हातात दगड विटा घेऊन - मुंबई तुमची होणार नाही - मुंबई तेंव्हाचं तुमची होईल जेंव्हा तुम्ही कष्ट करणार - मेहनत घेणार - परिश्रम करणार - छोटा जरी असला तरी स्वतःचा एखादा हक्काचा व्यवसाय सुरु करालं -

इतिहास साक्षीला आहे, इंग्रजांनी केवळ व्यापाराच्या ताकदीवर अवघ्या जगावर राज्य केल होतं आणि त्याचं इंग्रजांना आपल्या छत्रपतींनी मुठ भर मावळ्यांना सोबत घेऊन धूळ चारली होती - आणि #छत्रपतीशिवाजीमहाराज हे अगोदर #उद्योजक होते मग ते राजा झाले आणि त्यानंतर ते छत्रपती होऊ शकले - एवढी ताकद उद्योजकते मध्ये होती आहे आणि असते आणि त्याचं शिवरायांचा वारसा सांगणारे तुम्ही आम्ही मुंबईतून बाहेर फेकले जात असू तर आपल्याला शिवरायांचा वारसा सांगण्याचा खरोखर अधिकार आहे का -??? हा सवाल हर एक मराठी माणसाने स्वतःला विचारण्याची वेळ उभी ठाकली आहे.. अस आम्हाला वाटतं ....

मी कोणता नेता नाही किंवा कोणता पुढारी नाही त्यामुळे तुम्हाला आव्हान करनार नाही तर  तुम्हाला हाक देतोय - चला मिळून आपण मुंबई मध्ये शिवरायांच्या विचाराने आणि प्रामाणिक कष्टाने -  मराठी माणसाची ताकद उभी करू -

फक्त तुम्ही तुमच्या हिमतीवर शिवरायांचे वारसदार म्हणून छोटं असल तरी
स्वतःचं उद्योजक साम्राज्य उभ करावं हाच आमचा थोडा फार हेतू ......"
-

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...