Skip to main content

#हरितगृह..

हरितगृह म्हणजे वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती व पूर्ण छत पारदर्शक असणारी काचेची मानव निर्मित एक कृत्रिम खोली. हिला ‘ग्लास हाऊस’ असेही म्हणतात. अति थंड प्रदेशात अत्यंत कमी असलेले तापमान अनेक झाडांना/वनस्पतींना सहन न होण्याने त्यांची योग्य अशी वाढ होत नाही किंवा त्या मरतात.अशा वनस्पतींचे संरक्षण करण्यास करण्यात आलेली ही व्यवस्था आहे.

युरोपात सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून काचेच्या हरितगृहात विविध प्रकारच्या वनस्पतीची लागवड सुरू झाली. प्रो इमरी केर्यस या केन्टुकी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने १९४८ साली पहिल्यांदा हरितगृहासाठी लोखंडी /अल्युमिनियम/लाकूड/बांबूच्या सांगाडयावर काचेच्या पारदर्शक आच्छादनाचा वापर त्यामध्ये करुन वनस्पतीची लागवड करता येते, हे दाखवून दिले. हरितगृहामध्ये वाढवलेल्या वनस्पतीनां वातावरणातील हानिकारक बदलापासून वाचविता येते. त्यांना अति पाऊस अति ऊन, धुके, यापासून संरक्षण मिळते. पॉलिहाऊस किंवा ग्रीनहाऊस (हरितगृह) या दोन्ही एकच गोष्टी आहेत. पूर्वी हरितगृहे लाकडी सांगाड्यावर आच्छादनासाठी काच वापरून उभी केली जात असत. आता प्लॅस्टिक तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणांमुळे काचेऐवजी प्लॅस्टिक वापरले जाते. काचेच्या तुलनेत पॉलिथीनचा वापर हा स्वस्त असल्याने पॉलिथीन आच्छादने लोकप्रिय झाली आहेत, त्यामुळे आता हरितगृहांना पॉलिहाऊस असेही म्हटले जाते.

कार्य

सूर्य उगवल्यावर, त्याची किरणे या खोलीत शिरून तेथील जमीन व वनस्पतींना ऊब देतात. या प्रभावाने तेथील तापमान वाढून वनस्पतींसाठी अनुकूल अशा पोषक वातावरण तयार होते. त्या खोलीतील उष्णता बाहेर जाण्यास जागा नसल्यामूळे ती उष्णता तेथेच कोंडली जाते, व त्यामुळे तेथील वनस्पतींचे रात्रीपण कमी तापमानापासून संरक्षण होते. साधारणतः,अतिशीत वातावरण असलेल्या ठिकाणी अथवा देशांत वनस्पती संशोधन करण्यास या व्यवस्थेचा उपयोग होतो. यात, वनस्पतीस पोषक असणारी सूर्यप्रकाशाची नैसर्गिक प्रक्रिया वापरण्यात येते.

हरितगृहामध्ये वातावरणातील पाच प्रमुख घटक नियंत्रितकेले जातात.

सूर्यप्रकाश – साधारण ५०००० ते ६०००० लक्‍सपर्यंत सूर्यप्रकाश हरितगृहामध्ये येऊ दिला जातो. त्यासाठी योग्य आकाराच्या सावलीच्या जाळ्याचा वापर केला जातो. सूर्याच्या प्रकाशातील अतिनील किरणे योग्य प्रकारची पॉली फिल्म वापरून रोखली किंवा नियंत्रित केली जातात. त्यामुळे वनस्पतीची योग्य वाढ होते.तापमान – दिवसा २४ ते २८ अंश सेल्सिअस व रात्री १५ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हरितगृहामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा तापमानाला वनस्पतीची चांगली वाढ होते.कार्बन-डाय-ऑक्‍साईड — ८०० ते १२०० पीपीएम CO2हरितगृहामध्ये अडविला जातो. हे प्रमाण बाहेरील वातावरणापेक्षा तीन ते चार पट जास्त असते. त्यामुळे वनस्पतीमध्ये अन्ननिर्मिती चांगल्या प्रकारे होऊन वनस्पतीची वाढ जोमाने होते.आर्द्रता – हरितगृहामध्ये सर्वसाधारणपणे दिवसा ६० ते ७० टक्के व रात्री ७० ते ८० टक्के आर्द्रता नियंत्रित केली जाते. त्यामुळे वनस्पतीची वाढ चांगली होते. वनस्पतीचा रोगांपासून व किडीपासून बचाव होतो.वायुवीजन – हरितगृहामध्ये ८ ते १० टक्के वायुवीजन होईल,अशा पद्धतीने वरची खिडकी व बाजूच्या खिडक्‍या यांच्या पडद्यांची उघडझाप केली जाते. त्यामुळे हरितगृहामध्ये हवा खेळती राहते.हरितगृहामध्ये वातावरणातील घटक नियंत्रित केले जात असल्यामुळे पिकाची उत्पादन व गुणवत्ता चांगली मिळते.

हरितगृहाचे प्रकार

लिन टूए फेमइबन स्पॅनकोनसेटगाॅथिक आर्चजियोडेसिक होममल्टिस्पॅन रिज अॅन्ड फरोकोनसेट विथ गटर सिस्टिम

उपयोग

कट-फ्लावर व भाजीपाला उत्पादनकुंड्यांमधील लागवडपिकांचे (फुले, भाजीपाला, फळे) यांचे उत्पादनभाजीपाला व शोभिवंत रोपांच्या रोपवाटिका करणेऊतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरणभाजीपाला पिकांच्या जातींचे व बीजांचे उत्पादन घेणेपिकांचे संशोधन व विकास

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...