Skip to main content

उधारी : पैसे वसूल कसे होतात ?

उधारी : पैसे वसूल कसे होतात ?

....
.....
धंदयात पैसा घेणे आणि वस्तू देणे हा नौर्मल व्यवहार , पण वस्तूच्या बदल्यात फक्त. काही दिवसांनी  पैसे मिळण्याचे आश्वासन म्हणजे ... "उधारी".
.....
या उधारीला समजून घेतले पाहिजे , फक्त राग - राग करून उपयोग नाही तर याचे विस्तृत Analysis करायला पाहिजे , जेणेकरून या संदर्भात उपाययोजना करायला मदत होईल .
. धंदयात पैसा हा ऑक्सीजन सारखा असतो , तो जर कमी पडला तर धंद्याचा श्वास गुदमरतो , चिडचीड , अपमान , सहन करावा लागतो .
तर ....
1) आपण उधारी का देतो .
__.... 1] आपल्याला ग्राहक संख्या वाढवायची असते , कशासाठी ???
दुकानात आणलेला मालावर नफा मिळवण्यासाठी ... बरं तो माल दुकानात राहिला तर काय सडणार आहे काय ? मग घाई कशाला करायची .
........... 2] सहानुभूती दाखवण्यासाठी .... किंवा माझ्याकडून थोडीशी मदत म्हणून, उधार देता आणि बुडत्याचा पाय खोलात सारखं गमावून बसता भांडवल .
............3] कधी - कधी मोठी एर्मजन्सी असते , अशा वेळी आपण सहजस उधार देऊन जातो .
............4] आपल्याला आपल्या स्पर्धकाला दाखवयचं असतं कि , माझ्याकडे किती ग्राहक आहेत ?   आणि त्या मोठेपणा दाखवण्याच्या नादात उधार - पाधार वाटून मोकळे होतो आणि आर्थिक अडचणीत येतो.
......

2) आपण उधारी कोणाला देतो ????
......... आपण कोणालाही उधार देत नाही , काहीतरी अगोदरचे बंध असल्याशिवाय
आपण कसे उधार वाटू ???
...........1] मित्र परिवार
............2] नातेवाईक , भावकी , किंवा नातेवाईकांचे नातेवाईक
............3] शेजारी , किंवा नुकतीच ओळख झालेले लोक .
यापैकीच कोणाला तरी आपण उधारी देतो . आणि ठरलेल्या वेळेत त्यांचे कडून पैसा आला नाही कि उधारी तटली असे आपण म्हणतो !
......

आता एकदा का उधारी दिली कि हातात काय रहातं ?
काहीही करून आपले पैसे वापस मिळवणे ... हाच मुख्य हेतू रहातो
तसे पाहता बऱ्याचदा वेळेवर पैसे देतात पण काही जरा जास्तच "पक्के" असतात .
पण बऱ्याचदा असे घडते कि , परिस्थिती हाताबाहेर जाते , भांडणं होतात , मारामारी होते . आणि डोकी पण फुटतात .
मग अशा वेळी काहीही करून रिकव्हरी करणेच आपले लक्ष  असते  , पण अशा रिकव्हरी करताना काही काळ ज्या घ्याव्या लागतातच .
.....
.....
काय घ्याव्या काळजी ?
.........1] सरळ सरळ साध्या शब्दात formal मागणी करावी
..........2] व्यक्ती समोर येतच नसेल तर ... साधारण कॉल करणे किवा Text करावे  .
..........3] समोरच्या व्यक्तीच्या घरी माणूस पाठवणे , आणि formal मागणी करणे .
..........4] कधीही फोनवर , किंवा व्हाट्स अप वर हिंसात्मक भाषा / शिवराळ भाषा वापरू
             नये .
           5] कौल रेकॉर्डिंग होऊन उगाचच अडचण वाढू शकते
          6] कधीही समोरच्याच्या पाहुण्या समोर , नातेवाईकांसमोर किंवा इतर त्रयस्थ व्यक्ती समोर पैशाची मागणी करूच नये , त्यामुळे असा अपमान जिव्हारी लागून वेगळ्या प्रकारे बदल्याची भावना बाळगू शकतात .
          7] अॅडव्हान्स चेक घेऊन किंवा बिलावर ग्राहकाची सही घेऊन त्याची कॉपी जवळ ठेवली त तर पुढे फायदा होईल .
         8 ] रिकव्हरी साठी समोरच्याने चेक , DD , pay tm , चिल्लर , दहाच्या नोटा , काहीही ऑप्शन दिला तरी तो स्विकारावा .
        9] Recovery Agent हा प्रकार सगळ्यात शेवटी च वापरावा किंवा वापरणे टाळावेच
       10] सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे एखादया प्रतिष्ठीत व्यक्तीस मध्यस्थी घालून , आपला दगडाखाली अडकलेला हात काढून घेणे .
        11] आणि सगळ्यात शेवटी शक्यतो उधारी देणे पूर्णपणे थांबवणे , दोन पैसे कमी आले तरी चालतील , माल दुकानात पडून राहीला तरी चालेल , उधारीला लांबूनच राम राम .
......
..... शक्यतो साधारण follow up केला तरी लोक त्यांची अडचण संपली कि , पैसे देतातच त्यामुळे आक्रमक न होता . सातत्याने follow up ठेवावा .
कधीच कोणाचा पैसा बुडत नसतो , फक्त वेळ कमी जास्त लागू शकतो .
संयम ठेऊन वसूली करावी !
....
...
शुभेच्छा .

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...