*बोनस म्हणजे काय ?*
काळजीपूर्वक वाचा
*कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.*
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. *आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात 52 आठड्यांचा पगार मिळत होता.* 4आठवड्यांचा एक महीना धरला असता *वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत.* परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा *13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा* लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. *भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी.* त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा *दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.*
अत्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण *कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते*. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. *हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.*
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाल होता.
हे महत्व कित्येकाना माहीत नाही. म्हणुनच ते बोनस म्हणजे बक्षीस समजून दिल तेव्हडे पैसे घेतात *मित्रांनो हे आपले हक्काचे पैसे आहेत उपकार समजून घेऊ नका* ही माहिती आज आपणास या द्वारे देत आहे.
Comments
Post a Comment