*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
_३९. पुढील उद्योग वाढीसाठी ५ ते १५% बाजूला ठेवा_
--------------------------------
*प्रश्न* : सर मी बी.ई. झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अँड्रॉईड, आयओएस, कस्टम अॅप डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट
करतो, परंतु गेली ४ वर्षे व्यवसायातील उलाढाल २० ते २५ लाखांहून पुढे जात नाही.
*उत्तर* : मित्रा, प्रथम तुझे अभिनंदन. शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय क्षेत्रात उडी घेण्याचा खूप चांगला निर्णय तू घेतला आहेस. शेतकरी पूर्वी जेव्हा बियाण्यांच्या कंपन्या नव्हत्या, तेव्हा पिकलेल्या धान्यापैकी काही धान्य पुढील वर्षी पेरण्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक जपून ठेवायचा. समजा, त्याने असे धान्य जपून ठेवले नाही, तर तो पुढील वर्षी पेरणार काय, उगवणार काय आणि खाणार काय? मित्रा प्रत्येक वर्षी तुझा व्यवसाय वाढवायचा असेल, तर तुही या वर्षीच्या व्यवसायातील उलाढालीपैकी किमान १० टक्के रक्कम पुढील वर्षीच्या व्यवसाय वाढीसाठी राखून ठेव. उदा. अॅडव्हर्टायझिंग, ब्रँडीग, लीड जनरेशन, सेल्स, आयटी प्रोजेक्टसाठी एक चांगला सेल्स मॅनेजर नेमल्यास दरमहा तो अंदाजे ५० हजार रुपये पगार घेतो व त्याला ५% इन्सेंन्टीव्ह द्यावा लागतो. तो तुला अंदाजे १५ ते २५ लाखांचा बिझनेस मिळवून देईल. त्याला लीड जनरेट करण्यासाठी एक ते दीड लाख रुपये खर्च येईल. व्यवसायात पैसे टाकल्याशिवाय पैसे निघत नाहीत. पेरल्याशिवाय उगवत नाही, ज्याच्यात मार्केटमध्ये पैसे फेकायची (गुंतवणुकीची) हिंमत नाही, त्याने कमाईची आशा करू नये व उद्योगात चुकूनही येऊ नये. मित्रा, तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment